‘ज्ञानप्रकाश हा सुसंस्कार देणारा प्रकल्प आहे.’ – अभिनव गोयल
लातूर ; दि.१०
ज्ञानप्रकाशच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत मिळविल्या यशाबद्दल गुणगौरव सोहळा नरहरे लर्निंग होम येथे संपन्न झाला .
ज्ञानप्रकाशच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. अभिनव गोयल यांना निमंत्रीत करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात छानशा प्रार्थनेने झाली.
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे प्रमुख सतीश नरहरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमात इ. 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा (इ. 6 वी व 9 वी), विज्ञानवारी-2022, ISKON (Value This Education contest) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक लातूर जिल्हा परीषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अभिनव गोयल यांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर मुलांनी सलगपणे काही गाणी एकत्र म्हणली. त्यामुळे प्रमुख पाहुणे व मोठ्या संख्येने उपस्थित पालकही भारावून गेले .
” कोविड काळातील परिस्थितीत ही मुलांचे यश हे उल्लेखनीय आहे. कोविड नंतरचा व लातूरमध्ये मी रुजू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा पहिला व सुंदर कार्यक्रम आहे असे ते म्हणाले. कार्यालयीन व्यस्ततेमुळे वेळ कमी असताना ही मी तुमचा उत्साह पाहून कार्यक्रमास पूर्णवेळ थांबलो असेही ते यावेळी म्हणाले. ज्ञानप्रकाश ही लाईफ स्किल देणारी प्रयोगशील शाळा आहे. सचिन तेंडुलकर, थॉमस एडिसन, डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम यांची उदाहरणे देत व अशा व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग सांगत आयुष्यातील येणा-या अपयश स्वीकारून पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज व्हा . “Failure is the first step of success” कधीही अपयशाने निराश न होता सातत्यपूर्ण प्रयत्नांनी यशस्वी व्हा, असे यावेळी ते म्हणाले. एक यश मिळाले थांबू नका पुढील यशासाठी त्याच जिद्दीने परत कामाला लागा, आवडीचे क्षेत्र निवडा, तुम्हाला जीवनामध्ये जे करायचे आहे तेच करा. “ज्ञानप्रकाश हा सुसंस्कार देणारा प्रकल्प आहे.” “नेहमी स्वप्न मोठे ठेवा.” Aim for the moon you will fall among the star”

IIT मधून या प्रशासकीय सेवेत तुम्ही कसे आलात या विद्यार्थ्यांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की
सेवा करणे हेच माझे स्वप्न होते, म्हणूनच ‘लोकांमध्ये मिळून त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मी हे क्षेत्र निवडले.माझे उद्देश सुदृढ होते. यावेळी त्यांनी लातूर जिल्ह्यात राबवलेल्या बाला उपक्रमा विषयी माहिती दिली. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश हमखास मिळते. हा मंत्र ही मुलांना दिला. Will Power is our strenghth
प्रश्नोतरांच्या माध्यमातून अभिनव गोयल यांनी सुसंवाद साधला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 9 वी वर्गातील कु. नक्षत्रा मोटे व कु. समृद्धी मगर यांनी केले.तर परिचय विभाग प्रमुख प्रशांत शिंदे यांनी दिला
प्रकल्पप्रमुख सतीश नरहरे, मुख्याध्यापिका व संचालिका सविता नरहरे, पर्यवेक्षक अशोक गुरदाळे, ज्ञानप्रकाश बालभवन बालविकास केंद्र व विद्यानिकेतन या तीनही विभागातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.