अर्थसंकल्पातील तरतुदींचा लातूर शहराला मोठा लाभ
लातूर/प्रतिनिधी:
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शुक्रवारी ( दि.११ मार्च ) विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प नवचेतना देणारा आहे.अर्थसंकल्पात विविध घटकांसाठी केलेल्या तरतुदींचा लाभ लातूर शहराला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे सांगून महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजितदादा पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत. हा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्र्यांनी समाजातील प्रत्येक घटक विचारात घेतला असल्याचे महापौर म्हणाले. गाव,शहर,महानगरे,तालुका व जिल्ह्याची मुख्यालये याच्यासाठीही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी टेलिमेडिसीन रुग्णालये उभारण्याकरिता ३ हजार १८३ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.लातूर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने याचा फायदा शहरातील नागरिकांना होणार असल्याचे ते म्हणाले. नालेसफाईकरिता आता स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार असून यामुळे लातूर मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे.

मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढवणे आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष प्रति योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता पुढील तीन वर्षात १ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.लातूर शहराच्या अर्थव्यवस्थेत सोयाबीनचा मोठा वाटा आहे.त्यामुळे याचा फायदा लातूर शहरातील व्यापार वाढण्यास होणार आहे. महापौर गोजमगुंडे यांनी सांगितलेकी,सीएनजी गॅस वरील कर १३.५० टक्क्यावरून कमी करून ३ टक्के करण्यात आला आहे. लातूर शहरात वाहनांसह घरगुती वापरकरिता पाईप लाईन द्वारे सीएनजी गॅस पुरवठा प्रकल्प राबविले जात आहेत.याचा फायदा लातूरकरांना होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांकरिता राज्यात ५ हजार चार्जिंग स्टेशन सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.लातुरातही असे स्टेशन सुरू होतील.यामुळे भविष्यात लातूर शहराचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांकरिता पंडिता रमाबाई उद्योजिका १०० टक्के व्याज परतावा योजना राबविण्यात येणार असल्याने महिलांना स्वावलंबी बनवण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. याचाही फायदा लातूरमधील महिलांना होणार आहे. लातूर जिल्ह्यातील सिंदाळा येथे सौर ऊर्जा प्रकल्पास मान्यता मिळाल्याने लातूर शहरातील त्याच्याशी निगडित उद्योजकांना वाव मिळणार असल्याचे महापौर म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३० हजार अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख रोजगार संधी मिळणार असून लातूर शहरातील उद्योजकांनाही त्यात संधी उपलब्ध होणार आहे. मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिल्याने ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होण्यास गती मिळणार आहे.राज्यासह शहरातील बांधवांना त्यातून लाभ होणार आहे. तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद केल्याचा फायदा लातूरला होणार आहे. गोजमगुंडे यांनी सांगितले की,अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यामुळे शहरातील आंगणवाडीही अधिक सक्षम होणार आहेत. पुरातत्व स्मारकांच्या जतन,संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय महावारसा सोसायटीची स्थापना करण्यास मंजूरी मिळाल्याने लातूरच्या गंज गोलाईसह ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन होणार आहे.शहरातील इतर स्मारकांचा त्यात समावेश करता येणार आहे. राज्यातील विद्यालयामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यासक्रम तयार करण्यात येण्यास मंजुरी देण्यात आली आहे.मुंबई येथे १०० कोटी खर्च करून मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे.लातूर शहरातील मराठी भाषा अभ्यासकांना याचा फायदा होणार आहे.तेथे उपलब्ध साहित्य मार्गदर्शक असणार आहे. राज्यासाठी उभारी देणाऱ्या,नवचेतना देणाऱ्या या अर्थसंकल्पातून शहरवासियांनाही लाभ होणार आहे.शहराच्या विकासाला नवचेतना मिळणार असून यातून नवे लातूर उदयास येणार असल्याचेही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. भविष्याचा विचार करत दूरदृष्टीने सादर केलेला हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,अर्थमंत्री अजितदादा पवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.

सीएनजी गॅस वरील कर १३.५० टक्क्यावरून कमी करून ३ टक्के करण्यात आला आहे. लातूर शहरात वाहनांसह घरगुती वापरकरिता पाईप लाईन द्वारे सीएनजी गॅस पुरवठा प्रकल्प राबविले जात आहेत.याचा फायदा लातूरकरांना होणार आहे.
मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढवणे आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष प्रति योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याकरिता पुढील तीन वर्षात १ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत.लातूर शहराच्या अर्थव्यवस्थेत सोयाबीनचा मोठा वाटा आहे.त्यामुळे याचा फायदा लातूर शहरातील व्यापार वाढण्यास होणार आहे.
पुरातत्व स्मारकांच्या जतन,संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय महावारसा सोसायटीची स्थापना करण्यास मंजूरी मिळाल्याने लातूरच्या गंज गोलाईसह ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन होणार आहे.शहरातील इतर स्मारकांचा त्यात समावेश करता येणार आहे.