शेतकर्यांचा दीड वर्षांपासून ऊस फडात उभा ; आणि सत्ताधारी कारखानदार नेते सत्कार स्विकारण्यात मग्न-माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे मत…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )
-सद्यस्थितीला लातूर जिल्ह्यासह निलंगा तालुक्यातील शिल्लक ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या सोळा महिने झाले तरी कारखाने ऊस घेऊन जात नाहीत,यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.तर दुसरीकडे सत्तेत बसलेले कारखानदार नेते माञ सत्कार घेत फिरत आहेत,अशी टीका भाजपचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पालकमंञी अमित देशमुख यांचे नाव न घेता केली.

ऊस शिल्लक राहिल्यामुळे उत्पन्नात घट होवून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.कारखानदार मोठ्याप्रमाणात विक्रमी गाळप केले म्हणून सत्कार स्विकारत आहेत,पारितोषिक घेत आहेत,असेही ते म्हणाले.लातूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस गाळपाविना पडून आहे.दीड वर्ष ऊस कारखाने घेत नसल्याने त्याचे शेतातच चिपाड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातील अनेक शेतात जाऊन शिल्लक ऊसाची परिस्थिती पाहिली आणि हा विषय मार्गी लावण्याची मागणी सरकारकडे केली.माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले,एवढ्या मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात ऊस शिल्लक राहीला म्हणजे कारखानदारांनी गेटकेनचा ऊस कमी भावात उचलला आहे.

मराठवाड्यात ऊसाची परिस्थिती गंभीर झाली आहे.या शिल्लक ऊसाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी.राज्य सरकारने ऊसाला दिलेल्या भावाची व आर्थिक महिने होऊनही ऊस उचलला जात नसल्याने शेतकर्यांच्या होणार्या नुकसानीची देखील जबाबदारी घेतली पाहिजे.ऊस वाळल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे,त्यामुळे यातील तफावतीची रक्कम सरकारने अदा करावी,अशी मागणीही माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.निलंगा तालुक्यातील मन्नथपूर येथील ऊस उत्पादक शेतकर्याच्या शेतात जाऊन पाहणी केल्यानंतर माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ही मागणी सरकारकडे केली.तसेच,राज्य सरकारने ऊसाला दिलेल्या भावाची व आर्थिक महिने होऊनही ऊस उचलला जात नसल्याने शेतकर्यांच्या नुकसानीची देखील जबाबदारी घेतली पाहिजे असे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.