25.9 C
Pune
Wednesday, June 18, 2025
Homeदिन विशेष"सर्जरी " चा प्रवास व आरोग्याच अर्थशास्त्र

“सर्जरी ” चा प्रवास व आरोग्याच अर्थशास्त्र

दिन विशेष –

राष्ट्रीय सर्जेन्स दिवस “सर्जरी ” चा प्रवास व आरोग्याच अर्थशास्त्र

डॉ. हंसराज बाहेती बाहेती हॉस्पिटल,लातूर

सर्जरी (शल्यचिकित्सा) चा इतिहास तसा फार रोमांचक आहे.मानवाच्या उत्क्रांती सारखाच तो पुढे सरकत गेला आहे. ‘ जन्म आजार वा अपघात- हे मृत्यू एक अविरत अविरत चालू असलेले कालचक्र आहे. जन्म व मृत्यू या मधला जो काळ असतो त्याला आपण “ जीवन” म्हणतो. त्याचा कालावधी हा विकसित होत असलेल्या वैद्यकीय शास्त्रान वाढवला हे मान्यच कराव लागेल.सर्जरीचा इतिहास हा वेदकाळापासून असल्याचा उल्लेख आहे. सुश्रुतहा सहाव्या शतकातला शल्यचिकित्सक. त्यानेच या विषयाचा पाया रचला.पुढे भुलशास्त्राच आगमन झाला. 1846 मध्ये टी. जी. मारटेन याने प्रथमच ईथूर व क्लोरोफार्मचा वापर भुलेसाठी यशस्वीपणे केला. भुलशास्त्र व सर्जरीच कौशल्य हे एकमेकांना बरोबर घेऊनच पुढे सरकत गेल. मागच्या कांही दशकात शरीर रचना, शरीर क्रिया व शरीरातल्या जीव रसायन शास्त्राचा खूपच बारकाईन अभ्यास झाला. त्याला नवनवीन तंत्रज्ञानाची साथ मिळाली. संपर्क-शास्त्र इतक्या वेगान पुढे जाऊ लागल की हजारो मैलावरुनची बातमी व तिथलं सशोधन क्षणार्धात आपल्याजवळ येऊ लागल.शरीरातील विकार व निर्माण झालेली गुंतागुंत अचूक ओळखण्याच्या तपास यंत्रणा खूपच विकसित झाल्या. 1895 मध्ये विल्यम रेईंटजन ने लावलेला एक्स-रे चा शोध हा क्रांतीकारी ठरला. त्यानंतर 2001 मध्ये रेमण्डडेडियनने एम. आर. आय. या अत्याधुनिक निरीक्षण यंत्राचा शोध लावला व आता तर इलेक्ट्रॉन, प्रोटोन व लेजर पर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत.अगोदर ओपन सर्जरी, म्हणजे पोट कापून मग त्यात विविध दिशेने विजेचे झोत सोडायचे व मग शस्त्रक्रियेद्वारे खराब झालेले अवयव एकतर काढून टाकायचे किंवा दुरुस्त करायचे, हे काम तासन तास चाले.रक्तवाहिन्या तुटल्यानंतर त्यांना झाळण्याचे (कॉटरी करण्याचे) तंत्र विकसीत केले ते 1920 मध्ये विलियम बोवी या फ्रान्सच्या इंजिनिअरनी. मग थोडा सर्जरीचा वेग वाढला. पुढे जाऊन पोटावर एक लहानसा छिद्र करुन त्यात डोकावून पाहणाऱ्या दुर्बिनिंचा शोध लागला. यालाच म्हणतात Laparoscopy .भारतातील पहिली लॅपरोस्कोपीक सर्जरी (पित्ताशयाची पिशवी काढण्याची) करण्याचा मान मुंबई येथील डॉ. टेम्पटन उडवाडीया यांना जातो. त्यांनी ही दुर्बिनीद्वारे यशस्वी सर्जरी 31 मे 1990 ला मुंबईच्या जे. जे.हॉस्पिटलमध्ये केली व “सिंधूर सारखाच जगातल्या वैद्यकीय क्षेत्राला मोठा आश्चर्याचा धक्का दिला. लॅपरोस्कोपीमुळे मोठ्या पडद्यावर आपल्या दृष्टीच्या कितीतरी पट मोठ करुन खूप कमी वेळात शस्त्रक्रिया होऊ लागल्या.पेशंट मोठ्या ऑपरेशन नंतरही लवकर बरे होऊन कामावर लवकर परतू लागले. मग अश्या दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया शरीराच्या इतर भागावरही होऊ लागल्या. आता तर शस्त्रक्रियेसाठी “ रोबोट ” (Robot ) हे मदतीला आले आहेत. हा सगळा आधुनिक तंत्रज्ञानाचा इतिहास तसा मागच्या 50-6 वर्षाचाच आहे. अगदी साध पतंग उडवता उडवता मंगळावर झेप घेण्यासारखच आहे हे सर्व ई. स. 70 ते 80 च्या दशकात हदयाच्या शस्त्रक्रियेसाठी अनेक दिग्गजांनी इंग्लंड गाठल्याच आपण वाचत होतो. त्याच शस्त्रक्रिया आता लातूरात अगदी नित्यान होत आहेत. दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया हा आता चर्चेचा विषय सुध्दा राहिला नाही. अगदी नवीन जन्मलेल्या मुलांवरही तासनतास यशस्वी शस्त्रक्रिया लातूर सारख्या ठिकाणी होत आहेत.खराब झालेले गुडघे बदलून नवे बसवले जात आहेत. जुना मेंदू काढून नविन मेंदू बसवण्याचे दिवस आता दूर नाहीत. किडनी, लिव्हर, हदय हे तर नित्याने प्रत्यारोपण केले जात आहेत. “जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी ” असाच हा सर्वप्रकार आहे. पण……हे सर्व उपचार सर्वाना परवडणारे नाहीत. या मागचअर्थशास्त्र आणि त्यातली ‘गुपित’ व ‘गुंतागुंत’ ही लोकांनी समजूनvघेण्याची खूप गरज आहे. मागच्या कांही दशकात दोन शब्द खूप प्रचलीत झाले. एक “ पेटंट हा तर दुसरा Lobbying (लॉबीयींग) हा. या दोन शब्दांनी व त्या मागच्या वृत्तीनी समाजात वेगळीच क्रांती केली. सर्वच क्षेत्रात ” सेवा हा शब्द कालबाह्य होऊन त्या जागी व्यवसाय हा शब्द आला. (खूप वर्षापूर्वी राजकारणातल्या एक दिग्गज नेत्यानी राजकारण,,हा एक व्यवसाय आहे हे म्हटल्याच तुम्हाला आठवत असेल. ) पेटंट म्हणजे कोणतही संशोधन असो वा साहीत्य असो, ते कितीही लोकोपयोगी असले तरी ते संशोधकाच्या किंवा साहित्यीकाच्या परवानगीशिवाय …..व त्यांचे सर्व “ सोपस्कर ” पूर्ण केल्याशिवाय तुम्ही वापरु शकत नाही. मग हे संशोधन मार्केट मध्ये सर्रास अवाढव्य किंमतीमध्ये घेतले व विकले जाऊ लागले. मग त्याच्या वापरण्यासाठी व त्याच्या मार्केटींगसाठी सुरु झाली मोठ्या प्रमाणात Lobbying व देण्यात येणारी विविध प्रलोभने. हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान हे यामुळेच खूपच महाग झाले. ही अत्याधुनिक यंत्रणा ‘सेवादक्ष’ रहावी म्हणून कंपन्या मेन्टेनन्स चार्जेस घेऊ लागल्या. हे मेन्टेनन्स चार्जेस वर्षाला लाखों रुपयांवर असते. व्याजानी घेतलेली ही अतिमहाग यंत्र व नंतर त्यांना कार्यक्षम ठेवण्यासाठी द्यावा लागणार प्रचंड निधी, हेच खरे कारण आहे वाढत्या आरोग्यावरील खर्चाचे व हॉस्पिटलच्या वाढत चाललेल्या बिलांचे.जगात जेवढ्या ज्ञात क्रांत्या झाल्या मग ती रशियन क्रांती, फ्रेंच क्रांती, अमेरिकन क्रांती असो अथवा माओचा चिन मधला लाँग मार्च असो. ह्या सर्व क्रांत्या सामान्य माणसाची होणारी पिळवणूक व त्याचं होणार शोषण थांबवण्यासाठीच होत्या. पुढे त्या सर्व क्रांतीनेत्यांचे उभारलेले पुतळे त्याच देशात जमिनीवर पाडण्यात आले. अगदी आपल्या आसपासही हे घडल.कारण आता सर्वच क्षेत्रात ” माणूस “ हा केंद्रबिंदू न राहता “वर्चस्व” हा केंद्रबिंदू आहे. मग ते वर्चस्व सत्ता संपत्तीच असो की व्यवसायाच. हा केंद्रबिंदू असा कसा अलगत सरकत गेला, कोणाला कळलच नाही.Everything is fair in Love and War मध्ये आता Business हा शब्दही जोडण्यात आला आहे.सत्ता व संपत्तीच्या भोवऱ्यात सापडलेल्या जगभरातल्या जागोजागच्या सरकारांनी सामान्य माणसांच्या वेदनांच भांडवल तर केल पण ही सर्व जबाबदारी त्यांनी वेगवेगळया Insurance कंपन्यांच्या गळयात (आपले सर्व सोपस्कर पडद्याआड पूर्ण करुन ) बांधली. Insurance या संकल्पनेचा जन्मच मुळात युरोपच्या “ सट्टा बाजारातून” झाला आहे. इन्शुरन्स कंपन्या म्हणजेदुसर तिसर काहीही नसून तो एक सरकारमान्य मजेशीर सट्टाच आहे.प्रिमीयमच्या नावाने लाखोंकडुन जमा करायचे व कांही लोकांना त्याचा फायदा देऊन बाकीचे लुबाडायचे. अकाली व अपघाती मरणाची भिती किंवा आजारातील होणाऱ्या अमाप खर्चाची भिती हे त्यांच बिज भांडवल.अमेरिकेसारख्या 250 वर्षापेक्षा जुन्या लोकशाही व जनकल्याणाच्या घोषणा देणाऱ्या देशात आजमितीला जर तुमच्याकडे “ आरोग्य विमा” नसेल तर उपचारापेक्षा मरण बरे म्हणण्याची वेळ आली आहे. मोठ-मोठया कार्पोरेट हॉस्पिटलचा जन्मच या Lobbying तून झाला आहे. आपली ही वाटचाल त्याच दिशेने आहे.तज्ञ सर्जन्सची व इतर तज्ञांची चालवली जाणारी छोटी छोटी रुग्णालये,जी खूप चांगली सेवा माफक दरात देण्याचा आटापीटा करत आहेत, पण त्यांच्यावर शेकडो कायदे लादून ती कशी उध्वस्त होतील यावर भर आहे.मग हे सर्व तज्ञ डॉक्टर व त्यांचे सर्व रुग्ण कॉर्पोरेट – हॉस्पिटलकडे वळती करायची हा यातला खरा डाव आहे. एके काळी सरकार चालवत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद कश्या पाडल्या व सर्वत्र खाजगी शाळांचे जाळे कसे विणले गेले. त्या जाळयात गरीब वर्ग पुरता कसा अडकून गेला… हे आपण अनुभवतच आहोत.बड्या बड्या इन्शुरन्स कंपन्यांचे चालक व कार्पोरेट हॉस्पिटलचे मालक यांनी सरकारचा हात हातात धरल्याने त्यांच्यावर आता कोणीच हात उगारु शकत नाही याची त्यांना खात्री आहे.लोकहो, हे समजून घ्या. सरकारी दवाखान्यात कल्याणकारी राज्यामध्ये उपचार हे (गरिबांसाठी) मोफतच होतात व ते झालेच पाहिजेत. पण तेथेही महात्मा फुले व इन्शुरन्स कंपन्यांचे बोर्ड दिसत आहेत.आपण सर्वजण आता आशा करु या की सरकार गोरगरिबांच्या आरोग्य रक्षणाच दायित्व पुन्हा स्वतःकडे घेईल व अश्या विमा योजनांना चाप बसेल. उत्तम सेवा देणाऱ्या छोट्या-छोट्या दवाखान्यांना व तेथील तज्ञ डॉक्टरांना सरकारच पाठबळ मिळेल. उलट दिशेन फिरणारं हे कालचक्र थांबून योग्य दिशेन फिरेल. जनतेन जागरुक राहून आपल योगदान देण गरजेच आहे.हिंदी सिनेमा (हरियाली और रास्ता ) मधल एक गाण आठवलं…”जहाँ हम आकर पहुँचे हैं, वहाँ से लौटकर जाना,नहीं मुमकीन मगर मुश्कील है तुफानों से टकराना ” .एकंदरीत स्थिती अशीच आहे.

• डॉ. हंसराज बाहेतीलातूरM.S.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]