रेणापूर नगर पंचायत इमारतीस दहा कोटींचा निधी उपलब्ध
करून दिल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचे आभार
लातूर दि.०३ – रेणापूर नगरपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी राज्य शासनाकडून दहा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचा रेणापूर शहर भाजपा आणि पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या वतीने मंगळवारी लातूर येथे यथोचित सत्कार करून आभार व्यक्त केले.
रेणापूर गावाला तालुक्याचा दर्जा मिळूनही अनेक वर्ष ग्रामपंचायतच असल्याने अपेक्षित विकासाची कधीच कामे झाली नव्हती. मा. देवेन्द्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना रेणापुरला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. पाच सहा महिन्यात झालेल्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली आणि पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाची दालने खुली झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गेल्या पाच वर्षात रेणापूर शहराचा मूलभूत सुविधेसह कोट्यावधी रुपये खर्चाचा अंतर्गत रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा योजना, समाज मंदिर, सामाजिक सभागृह, अग्निशामन इमारत, समशानभूमी संरक्षण भिंत यासह सर्वांगीण विकास योजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाली.

सर्व सोयीने युक्त सुसज्ज अशी रेणापूर नगरपंचायतीची इमारत व्हावी यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने नियोजित या इमारती करिता शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि रेणापूरच्या विकासाची घौडदौड सुरू झाल्याने रथाची प्रतिकृती भेट देऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांचा यथोचित सत्कार रेणापूर शहर भाजपा पदाधिकारी आणि नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यावतीने मंगळवारी लातूर येथील संवाद कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, पानगावचे माजी सरपंच सुकेश भंडारे, शहराध्यक्ष दत्ता सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड यांनी जनतेने टाकलेल्या विश्वासाला अभिषेक आकनगिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पात्र राहून अपेक्षेपेक्षा अधिक ४०-५० कोटी रुपयाची कामे केली अनेकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ दिला. येत्या काळात होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वांनी जिद्दीने जोमाने काम करून नगराध्यक्षासह १७ पैकी १७ सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून यावेत आणि पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा नगरपंचायतीवर फडकवावा असे आवाहन केले.

गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची सविस्तर माहिती देऊन यावेळी बोलताना पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे म्हणाले की, आ. रमेशआप्पा कराड यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी माझ्यासारख्या तरुणावर विश्वास ठेवून नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली मिळालेल्या संधीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात रेणापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याचमुळे स्वर्गीय मुंडे साहेबांनंतर रेणापूरच्या विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असल्याचे बोलून दाखवले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी दत्ता सरवदे यांनी आभार मानले
यावेळी विजय चव्हाण, राजकुमार आलापुरे, उत्तम चव्हाण, लखन आवळे, अजीम शेख, हणमंत भालेराव, गणेश चव्हाण, अंतराम चव्हाण, रमेश वरवटे, दिलीप चव्हाण योगेश राठोड, व्यंकट अकनगिरे, उत्तम घोडके, धम्मानंद घोडके, मनोज चक्रे, विशाल कांबळे, शरद चक्रे, रफिक शिकलकर, विकी राजे, नागेश बस्तापुरे, मारुफ आत्तार, हुसेन पठाण, सुभाष राठोड, माऊली सातपुते, पप्पू कुडके, सोमनाथ सातपुते, जयदीप बोडके, परमेश्वर मोटेगावकर, महेश राठोड, शरद जाधव, सोपान सातपुते, दत्ता कातळे, राहुल शिंदे, प्रवीण चव्हाण, अफजल सय्यद, उमाकांत कांबळे, मुरली चक्रे, मारुती माने यांच्यासह रेणापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.