येणारे वर्ष निवडणुकीचे कार्यकर्त्यांनो, जिद्दीने
जोमाने कामाला लागा – आ रमेशआप्पा कराड
लातूर दि.१७- येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुका होणार असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ गरजूंना मिळवून द्यावा. विविध योजनांची चर्चा गावागावात घडवून आणावी आणि सक्रियपणे पक्षाच्या कामात रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.
प्रदेश भाजपाच्या सूचनेनुसार १६ जुलै रविवार रोजी रेणापूर तालुका भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत रेणापुर तालुक्यातील मौजे मोहगाव शिवारातील शरद दरेकर यांच्या शेतीफार्म हाऊसवर टिफिन बैठक झाली. या बैठकीस भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश भाजपाचे सदस्य अनिल भिसे, भाजपाचे तालुका अध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, सांगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे, ओबीसी आघाडीचे डॉ. बाबासाहेब घुले, महेंद्र गोडभरले, श्रीकृष्ण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या रूपाने देशाला कर्तृत्ववान पंतप्रधान मिळाला असून भारतीय जनता पार्टी शिस्तप्रिय असून या पक्षात संघटनेला अधिक महत्त्व आहे. संघटना हीच ताकद असून कार्यकर्ते ऊर्जा आहेत असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, भाजपाचे जनसंपर्क अभियान रेणापूर तालुक्यासह लातूर ग्रामीण मतदार संघातील बऱ्याच गावात अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविले असून राहिलेल्या गावातही अभियान प्रभावीपणे राबवून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या कार्याची माहिती गावा गावात, वाडी तांड्यात, आणि घराघरात पोहचवावी. शासनाच्या विविध योजनेचा लाभ गोरगरीब, गरजू लाभार्थ्यांना मिळवून द्यावा.

येणारा काळ निवडणूकीचा असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सक्रीयपणे कामात रहावे. आपली सत्ता असल्याने ज्या ज्या मागण्या आपण करतो त्या मागण्यांना निश्चितपणे निधी मिळतो. मंजूर झालेल्या या निधीचे त्याचबरोबर केंद्रातील आणि राज्यातील भाजपा शासनाच्या वतीने झालेल्या विकास कामाचे श्रेय काँग्रेसचे मंडळी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जागरूक राहून फुकटचे श्रेय लाटणा-यांना जशास तसे उत्तर द्यावे असेही आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे यांनी केले तर शेवटी चंद्रकांत कातळे यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले. या बैठकीस येताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःचा टिफिन आणला होता शेवटी सर्वांनी एकत्रित सहभोजनाचा मनमुराद आनंद घेतला.

भाजपाच्या या टिफिन बैठकीस श्रीकृष्ण पवार, शरद दरेकर, शिवमूर्ती उरगुंडे, सुंदर घुले, रमाकांत फुलारी, विश्वनाथ खटके, अमर चव्हाण, रमेश कटके, दत्ता सरवदे, शिवाजी जाधव, शीला आचार्य, बालासाहेब पवार, सुरेश बुड्डे, परमेश्वर दंडे, किशोर श्रीगिरे, उज्वल कांबळे, दयानंद बानापुरे, विश्वनाथ गाडे, बंडू केंद्रे, प्रकाश गालफाडे, नवनाथ पांचाळ, प्रकाश जाधव, वीरेंद्र चव्हाण, पृथ्वीराज उरगुंडे, नरेश चपटे, मच्छिंद्र चक्रे, श्रीमंत नागरगोजे, प्रशांत डोंगरे, धोंडीराम ठोंबरे, अँड. एन. बी. जाधव, भागवत गडगिळे, ओम चव्हाण यांच्यासह रेणापूर तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.