पालकमंत्री ना अमित देशमुख यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल
खरोळा पाटी ते पानगाव रस्ता दुरुस्ती चे दिले निर्देश
रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू: महामार्ग बांधणीचे कामही लवकरच होणार
लातूर(प्रतिनिधी):- रेणापूर तालुक्यातील खरोळा पाटी ते पानगाव दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याच्या संदर्भाने आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार रस्ता दुरुस्ती चे काम सुरू झाले आहे. लवकरच या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे कामही सुरू होणार आहे.
रेणापूर-पानगाव-धर्मापुरी-परळी दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक 361 एच ) खरोळा पाटि ते पानगाव दरम्यान रस्ता खूपच खराब झाल्याची तक्रार त्या परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यांनी या तक्रारीची ताबडतोब दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्ता दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले असून पानगाव येथून हे काम सुरू झाले आहे. लवकरच ते खरोळा पार्टी पर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर महामार्ग बांधणीचेही काम हाती घेण्यात येईल असे कार्यकारी अभियंता श्री. स्वामी यांनी सांगितले .