आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला सव्वाविस लाखांची मदत
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-
व्यवस्थेची बेफिकरी, नापिकीने वाढणारे कर्जाचे डोंगर अन परतेफेडीची चिंता या धास्तीने अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले. त्यांची ही अकाली एक्झीट त्यांच्या चिला-पिलांवर आभाळ फाडून गेली. जगावे कसे अन जगवावे कसे ? या प्रश्नांनी मागे राहीलेल्यांचा जीव कासावीस झाला. अशांना आधार पुरवून जगण्याची नवी पायवाट देण्याचे काम मातृदह्यी नाना पाटेकर अन मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने केले. नामच्या या सहद्येतेतील सातत्य पुन्हा एकदा उजळले. निमित्त होते नाम फाऊंडशने ८१ आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराला दिलेल्या सव्वा विस लाखांच्या आर्थिक आधार दिला.

निलंगा येथील टाऊन हॉलच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. अक्का फाऊंडेशनच्या मार्गदर्शक रुपाताई पाटील निलंगेकर, नामचे राज्य समन्वयक राजाभाऊ शेळके, सामाजिक कार्यकर्ते तथा ऊस्मानाबाद जिल्हा नाम फाऊंडेशनचे समन्वयक डॉ. हर्षवर्धन राऊत, नामचे लातूर जिल्हा समन्वयक रामलिंग शेरे, व अॅड ज्ञानेश्वर चेवले बाळासाहेब पाटील ,बाळासाहेब शिंगाडे आदिची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त ८१ शेतकरी परिवाराला प्रत्येकी २५ हजाराची मदत देण्यात आली.

यावेळी मनोगतात राजभाऊ शेळके यांनी नाम ही मानुसकीची चळवळ आहे. सदैव ती तुमच्यासोबत आहे दिलेली मदत तशी थोडकी असली तरी त्यातून छोटेखानी व्यवसाय उभारा. मुला-मुलिंना शिकवा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी नामने बीड जिल्ह्यातील आर्वीत शैक्षणिक संकुल उभारले आहे. आवश्यकता भासल्यास तिथल्या शाळेत आपले पाल्य पाठवा.१ ते १० वी पर्यंतचे शिक्षण नाम करेल. त्यापुढेचेही शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा नामचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. रुपाताई पाटील यांनी नामच्या या कार्याचे कौतूक करीत नाना अन मकरंद यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. दिलेल्या मदतीचा योग्य कारणी वापर करा,आर्थिक आत्मनिर्भर व्हा, मुलां-मुलिंना शिकवा त्यांच्यावर सुसंस्कार करा असे त्यांनी शेतकरी परिवाराला सांगितले. प्रास्ताविक अॅड. ज्ञानेश्वर चेवले यांनी केले. आभार नामचे लातूर जिल्हा समन्यक रामलिंग शेरे यांनी मानले.