निटूर येथील जि.प.प्रशालेतील माजी शिक्षकांचा जुन्या आठवणींना उजाळा देत..विद्यार्थ्यांचा स्नेह-मेळावा उत्साहात साजरा..
निलंगा-(प्रतिनिधी)-निलंगा तालुक्यातील निटूर येथील जि.प.प्रशालेतील एसएससी-1993-94 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी स्नेह-मेळाव्यात ग्रामपंचायतमधील नवनिर्वाचित सरपंचसह,माजी शिक्षक आणि पञकार यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात संपन्न झाला.
तद्गनंतर प्रथम ग्रामपंचायतमधील नवनिर्वाचित सरपंच प्रतिभा अनिल सोमवंशी यांचा ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज यांची प्रतिमा शाल श्रीफल पुष्षहार देवून यथोचित सत्कार करण्यात आले.तसेच उपसरपंच शिवराज सोमवंशी,सदस्य दिनकर कवडे,बाबर पुष्पा,सोमवंशी संदीप,कांबळे लता,देशमुख सुजाता,उकळे भरत,व्यवहारे शिवनंदा,गस्ते रशिदाबी,शिंदे कृृष्णा,मधाळे रेखा,उपळे उषा,शिंदे श्रावण,भोसले पुरूषोत्तम,शिंदे मनिषा यांचा बॅचच्या वतीने शाल,श्रीफल,पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच पंकज कुलकर्णी,दिनकर निटूरे यांचाही आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.

तसेच,माजी शिक्षक आर.पी.साळुंके सर,पठाण सर,कानडे सर,सयद सर,शिंदे सर,उजेडे सर,शिंदे सर,रामेगावकर सर यांचा ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज यांची प्रतिमा शाल,श्रीफल,पुष्पहार देवून आदरपुर्वक सत्कार करण्यात आला.तसेच,पञकार विजय देशमुख,पञकार राजकुमार सोनी,पञकार एस.आर.काळे,पञकार प्रशांत साळुंके,पञकार संगमेश्वर करंजे यांचा शाल,श्रीफल,पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

स्नेह-मेळाव्यात तब्बल 30 व्या वर्षांनंतर विद्यार्थी-विद्यार्थींनी, माजी शिक्षकांची भेट झाल्याने एकमेकांशी भावनिक संवाद झाला जि.प.प्रशालेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.यात सदस्य गस्ते रशिदाबी,प्रतिभा सुर्यवंशी,संगिता दिक्षित,पुष्पा तेलंगे,उषा बनसोडे,रेखा कनशेट्टे, यांचा ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज यांची प्रतिमा,शाल,श्रीफल,साडी,पुष्षहार देवून आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.सुञसंचलन प्रा.संतोष सोमवंशी तर आभार दत्ता निटूरे यांनी व्यक्त केले.
सांब-सादनाथ ग्रामविकास पॅनलचे प्रमुख प्रा.अनिल सोमवंशी यांनी आपल्या मनोगतात म्हटले आपण येणार्या काळात बचत गटाच्या माध्यमातून गृृृह उद्योगासा चालना देणार असल्याचे सांगितले.

माजी शिक्षक सयद सर यांनी मनोगतात जि.प.प्रशालेमध्ये माझ्या सेवेस सुरूवात झाली आणि एसएससी-1993-94 बॅचच्या विद्यार्थ्यांना मला घडवण्यास संधी दिल्याने हा स्नेह-मेळावा मला माझ्या डोळ्यांनी पाहता येत असल्याने विद्यार्थ्यांना पाहून अभिमान वाटला आणि भविष्यकाळातील ही बॅच गरूड झेप घेईल यात कसलीही शंका नाही एक आदर्श बॅच म्हणून यांच्याकडे पाहिले जाते.मोठ्या वटवृृक्षात रूपांतर करतील अशी अशाही व्यक्त केली.

पञकार राजाभाऊ सोनी यांनी बोलताना म्हणाले या बॅचने गावात दिशादर्शक आणि समाजोपयोगी पायंडा पाडल्याने आदर्श घेतले पाहिजे असे ते म्हणाले.
याप्रसंगी विद्यार्थी गुरूनाथ पातळे,अंकुश कवडे,संतोष सोमवंशी,प्रशांत साळुंके,सुरेश गायकवाड,राजकुमार मुगळे,महेबूब फकीर,शिवाजी अरेराव,अविनाश मुगळे,दत्ता निटूरे,दत्ता जगदाळे,विठ्ठल वाघमारे,अजित कानडे,गोविंद माने,सूधाकर नागभुजंगे,धोंडीराम सोळुंके,निळकंठ गंगणे,सतिश सुतार,अर्जुन सोमवंशी,पद्माकर निटूरे,ताजोद्दीन शेख,गणिपाशा शेख,हुडगे बाळाप्पा,अशोक भुरे,संजय सोमवंशी,विजयकुमार डांगे,नागेश चपटे,श्रीनिवास रोडे,सुग्रीव सुर्यवंशी,दिलीप देशमुख,शाम काळे,रमेश सावळे तसेच रशिदाबी गस्ते,संगिता दिक्षित,पुष्पा तेलंगे,उषा बनसोडे,प्रतिभा सुर्यवंशी,रेखा कनशेट्टे हे उपस्थित होते.