लातूर ः अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूर येथे 29 मे रोजी देवराज अर्स भवनमध्ये आयोजित करण्यात आली असुन या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रण पत्र राज्याचे राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांना शिष्टमंडळ भेटून निमंत्रण पत्रिका देण्यात आली. त्याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे, कार्यकारिणी सदस्य सुरेश ढवळे, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.दत्तात्रय घोगरे, रघुनाथराव अवधुत छायाचित्रात दिसत आहेत.
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री सिद्रामय्या, डी.के.शिवकुमार, आ.ईश्वर खंड्रे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कर्नाटक राज्यात दि.29 मे रोजी बेंगलोर येथील डी.देवराज अर्स भवन सभागृहात अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना द्वितीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असुन या अधिवेशनात देशातील दहा राज्यातील दिड हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे गोंधळी समाज दुसरे राष्ट्रीय अधिवेशन दि.29 मे 2022 रोजी होणार असुन या अधिवेशनाच्या तीनही सत्रात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराजजी बोमाई, विधान परिषदेचे सभापती रघुनाथराव मलकापुरे, माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, कर्नाटक राज्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार, काँग्रेस कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आ.इश्वर खंड्रे, आ.राजशेखर पाटील, कर्नाटक राज्यमंत्री पी.सुनिलकुमार, राज्यमंत्री गोविंद कारळजोल, राज्यमंत्री श्रीनिवास कोटा, राज्यमंत्री व्ही.सोमन्ना, राज्यमंत्री प्रभु चव्हाण, आ.शरणु सलगर आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीन सत्रात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पत्रकात नमुद करतांना हे राष्ट्रीय अधिवेशन दि.29 मे रोजी सकाळी 10.00 वाजता उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असुन यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, आ.इश्वर खंड्रे, आ.राजशेखर पाटील, माजी मंत्री पी.जी.आर.सिंधीया, माजी मंत्री एच.अंजनीया, माजी मंत्री अशोक खेनी, माजी मंत्री एच.एम.रेवण्णा, माजी मंत्री बंडेप्पा काशेमपुर, माजी आ.एम.डी.लक्ष्मीनारायण, आ.रहीम खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.दिलीपराव गुरूड हे राहणार असुन याप्रसंगी देशातील दहा राज्यातून आलेले गोंधळी कलापथक गोंधळ जागरण कलेचे सादरीकरण करणार आहेत.
या अधिवेशनात दुपारी 2.00 वाजता चिंतन-मंथन सत्राचे आयोजन करण्यात आले असुन या सत्राचे उद्घाटन कर्नाटक जनपथ अकॅडमीचे अध्यक्ष पद्मसिंग मंजम्मा जोगती यांच्या हस्ते करण्यात येणार असुन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर, ओबीसी आणि शेतकरी नेते पाशा पटेल, महाराष्ट्राचे राज्यमंत्री संजय बनसोडे, विधान परिषद सदस्य भिमराव बी पाटील, कर्नाटक साहित्य अकॅडमीचे बी.व्ही.वसंतकुमार, डॉ.जयदेवी गायकवाड, ए.एम.मंदारी, विजयकुमार बेळगी, प्रा.जयरमय्या कोंडे, विठ्ठल बी गणाचारी, बी.व्ही.भोसले हे उपस्थित राहणार आहेत. या सत्राचे अध्यक्षस्थान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड भुषवतील.ङ्ग या सत्रात नामदेव अटक, सहदेव गणाचारी, शंकर जिरगे, सुरेश गायकवाड, परशुराम इंगळे, मंजुनाथ परगे, शिवाजीराव वाकोंडे, शंकरराव कोडले, गुरूप्रसाद वाकोडे, सचिन नवखेले, विजय भोराथ, लक्ष्मणराव घोगरे, दिलीप ढवळे, मुरली थोरखडे, संतोष सोळूंके, प्रभाकर ढवळे, चंद्रशेखर गुरूदकर, तुकाराम वस्तार, नरसिंम्हा ससाणे, अमृता माने, संतोष काटे, उल्हास काटे आदि आमंत्रीत करण्यात आले आहे.
सायंकाळी 4 वाजता समारोप सत्राचे मुख्य मार्गदर्शक कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मय्या असुन याप्रसंगी पाहुणे म्हणून कर्नाटक विधानसभा सभापती रघुनाथराव मलकापुरे, कर्नाटक राज्याचे मंत्री ना.पी.सुनिलकुमार, ना.गोविंद करजोल, ना.श्रीनिवास कोटा, ना.व्ही.सोमन्ना, ना.प्रभु चव्हाण, ना.शरणु सलगर राहणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तथा अखिल भारतीय गोंधळ समाज संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष दिलीपराव शिंदे राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवानंद पाचंगी, बाबासाहेब कदम, मोहन भिसे, राष्ट्रीय सहसचिव सुरेश काळे हे करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्याकरिता स्वागत समिती नियुक्त करण्यात आली असुन अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष डॉ.सिद्राम डी.वाघमारे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, डॉ.संतोष काळे, रमेश भिसे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश ढवळे, रजनी पाचंगे, किशोर ढेंबे, ज्ञानेश्वर बडगे, शिवनारायण रेणुके, दिलीपराव पाचंगे, संतोष भांडे, उल्हासराव काटे, अॅड.संतोष घोगरे, संभाजी खाडे, दिवाकर बावणे, अविनाश नवरखेले, गणपतराव पाचंगे, श्रीकृष्ण बोटुळे, लक्ष्मण गायकवाड, मुकूंद मोरे, विजयकुमार मोरे, गणेश गरूड, भरतराव कदम, शाहीर अप्पासाहेब उगले, शाहीर सुभाष गोरे, अॅड.दत्तात्रय घोगरे, राहुल ढेंबे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार समारोह सोहळा होणार असुन गोंधळी समाज बांधवांनी या दुसर्या अखिल भारतीय गोंधळी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकात राजेंद्र वनारसे यांनी केले आहे.