लातूर दि.२३ :- भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ७५ गावासाठी ४ कोटी रुपयांचा आणि वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ४ तांडा वस्तीसाठी ४० लाख रुपये असे एकूण ४ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचे त्या त्या गावातील नागरिकांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आल्यापासून ग्रामीण भागातील विकासाला मोठी गती मिळाली आहे. विविध विभागाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सर्वांगीण विकासाची कामे केली जात आहेत. गरजूंना आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यासह संकटग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे.
लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावागावाचा, वाडी, तांड्याचा विकास व्हावा यासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर सर्व संबंधिताकडे पाठपुरावा केला. आ. रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून कृष्णानगर ता लातूर, सतधरवाडी तांडा ता. औसा, रेणापूर तालुक्यातील कोळगाव तांडा, फरतपूरच्या सेवानगर तांडा या ४ तांडावस्ती करीता ३९ लाख ९२ हजार रुपये आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील लातूर तालुक्यातील ३५ रेणापूर तालुक्यातील ३० आणि भादा सर्कल मधील १० याप्रमाणे ७५ गावातील रस्ते आणि नाली बांधकाम कामाकरिता तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील रामेश्वर, नागझरी, जेवळी, मुरुड, चिंचोली (ब), गातेगाव, मांजरी, मुरुड अकोला, कासार जवळा, जवळा बु, वांजरखेडा, भातांगळी, पिंपळगाव आंबा, चिकलठाणा, कासारखेडा, सलगरा, मुशिराबाद, तांदूळवाडी, गाधवड, शिराळा, येळी, टाकळी (ब), निवळी, बोडका, चाटा, एकुर्गा, भोयरा, टाकळी (शि), हिसोरी, सलगरा ख, समसापूर, कारेपूर, पानगाव, खरोळा, पोहरेगाव, सुमठाणा, दर्जीबोरगाव, आरजखेडा, बिटरगाव, गरसुळी, चाडगाव, मोरवड, पळशी, कोष्टगाव, फावडेवाडी, खलग्री, मुसळेवाडी, व्हटी, सायगाव, आसराचीवाडी, माणूसमारवाडी, बावची, तळणी, आनंदवाडी, इटी, भादा, भेटा, कोरंगळा, वरवडा, येलोरी, सतदरवाडी, लाखनगाव, उटी, टाका, अंकोली, शेरा, ढाकणी, वंजारवाडी, कुंभारी, वानवडा, कुंभारवाडी, नरवटवाडी, बोरगाव काळे, सामनगाव, शेलू (बु) या ७५ गावासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ४ कोटी रुपयाचा मंजूर झाला आहे. सदरील गावागावात निधी मंजूर झाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांचे त्या त्या गावातील नागरिकासह भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
