23.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeलेखमाणूस….

माणूस….

भावपूर्ण श्रद्धांजली

जन्मला येणं आणि ते सार्थक करणं यात जो फरक असतो तो म्हणजे एस आर काका..

माणस शून्यातून विश्व निर्माण करतात, काकांनी उणेतून विश्व निर्माण केले.. स्वतः उभे राहिले, कुटुंब उभं केलं, आईला सन्मान मिळवून दिला, भाऊ घडवले.. आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं, सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.. आज त्यांच्या कुटुंबात सदस्य अनेक आहेत पण ओळख एक आहे एस आर..

फक्त कुटुंबच घडवलं नाही तर राजकारण, समाजकारण करताना अनेक सहकारी, कार्यकर्ते घडवले, सांभाळले.. शहरातील अनेकांची नावे घेता येतील ज्यांना काकांनी आधार दिला, सांभाळलं, मोठं केलं.. अस राजकारणात खूप कमी पाहायला मिळत आणि आजकाल तर ते दुर्मिळ, अशक्य झाले आहे.. ते स्वतः नगराध्यक्ष राहिले, DCC बँकेचे चेअरमन राहिले.. अनेक निवडणुकांचे यशस्वी समनव्यक राहिले, जबाबदारीत राहिले..

एरवी तर 12 महिने 24 तास लोकात रमणारे, त्या शिवाय न करमणारे काका आपण पाहिलेच आहेत पण खास करून निवडणुकीत तर जेंव्हा ही अवघड काम असेल, पराकोटीची अडचण असेल तेंव्हा लातूर मध्ये विश्वासाने एकच नाव आठवायचे ते म्हणजे एस आर काका.. कसलीही कामगिरी फत्ते करणार म्हणजे करणार, निवडून न येणारा उमेदवार सुद्धा निवडून आणणार..

निवडणुकीत पूर्व भागात कोण पाहिजे अस विचारलं की लोक म्हणायचे काकांना पाठवा, पश्चिम भागात ही तेच.. मित्र पक्षांना समनव्य साधण्यासाठी कोण पाहिजे म्हणून विचारले की एस आर काकांना पाठवा म्हणायचे.. मनपा निवडणुकीत एखादा वार्ड जड चालला की काकांना 2 दिवस तरी पाठवा अशी मागणी यायची..

म्हणजे निवडणूक कोणती ही असो, पक्ष आपला असो की मैत्रीतला सगळ्यांना काका हवे असायचे, एवढे सर्वसमावेशक, सर्वमान्य नेतृत्व त्यांनी घडवले होते स्वतःचे.. स्वतःचा कोणता गट नाही, त्यामुळे कोणाशी भेदभाव नाही. जे असेल ते नेत्यांचे, जे असेल ते पक्षाचे.. मी एकदा एका प्रमुख कार्यकर्त्याला म्हणालो होतो की व्हायचे असेल तर एस आर काका व्हा..

असे एस आर काका आज शरीर रूपाने आपल्यात नाहीत, पण स्मृती रूपाने आपल्यात कायम राहतील.. जीवन जगताना त्यांनी स्वतःसाठी आठवणी निर्माण केल्या, stories तयार केल्या.. त्यातून आपण त्यांना कायम आठवत राहू..

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि आजच काकांच जाण हा ही योगायोग आहे.. औसा रोड वर जी दाट झाड आपण पाहतो, त्याची सावली आपण अनुभवतो ती सगळी एस आर काकांच्या काळात, त्यांच्या पुढाकाराने लावलेली आहेत.. त्यांची सावली आपल्याला काकांची आठवण सतत करून देत राहील.. काका ही असाच एक वृक्ष होते.. अशीच सावली प्रत्यक्ष जीवनात काकांनी अनेकांना दिली आहे..

काकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि यांच्या कुटुंबास यातून उभरण्याची शक्ती लाभो.. ओम शांती.

अभिजित देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]