25.5 C
Pune
Monday, June 9, 2025
Homeदिन विशेष*शब्दाला जागणारे सर्वसमावेशक नेतृत्व !*

*शब्दाला जागणारे सर्वसमावेशक नेतृत्व !*

वाढदिवस विशेष

हल्ली राजकारणात शब्दाला जागणारे नेतृत्व अपवादानेच बघायला व अनुभवायला मिळते.याउलट सत्तेच्या स्वार्थासाठी जनतेचा विश्वासघात करणा-यांची माञ मोठी गर्दी आहे.त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा राजकारणाबरोबरच नेतेमंडळींच्या प्रामाणिक कार्यावरील विश्वास कमी होत चालला आहे,हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही.असे असले तरी आपल्या प्रामाणिक जनहिताच्या कार्यातून राजकारणातून समाजकारण करता येते ,हे दाखवून देणारे माञ जनतेच्या मनात आदराचे भक्कम स्थान निर्माण करतात.अशा कार्यकुशल मंडळींना जनतेचे मिळणारे पाठबळ हीच त्यांची मोठी ताकद असते.याच ताकदीच्या बळावर व आपल्या प्रशासकीय कामकाजातील अनुभवी कौशल्याच्या जोरावर ते प्रशासनाकडून समाजातील विविध प्रलंबित मुलभूत विकासकामे मार्गी लावण्यात कमालीचे यशस्वी ठरतात.याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे राजकारणात राहूनही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारे व सर्वसामान्यांचा आपला हक्काचा माणूस अशी सर्वमान्य विश्वासार्ह ओळख निर्माण केलेले वस्ञनगरीचे सुपूञ माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार.ते केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपचे समर्थक असले तरीही विकासाच्या कामामध्ये कधीही राजकारण आणायचे नाही ,

समाजहिताच्या बाबींसाठी कायम पाठिंबा यासाठी आग्रही भूमिका कार्यरत असतात.म्हणूनच त्यांचे सर्व राजकीय पक्षांबरोबर सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत.कधीही काळ वेळ न पाहता आपल्याकडे काम घेवून येणा-या कोणत्याही माणसाचे काम झालेच पाहिजे , यासाठी ते प्रयत्नशील राहून काम मार्गी लावूनच शांत बसतात.म्हणूनच कदाचित शब्दाला जागणारे सर्वसमावेशक नेतृत्व,ही त्यांची ओळख सार्थ ठरली असावी.पालिकेत उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना नेहमीच त्यांच्या कार्यालयात सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारीची निर्गत होण्यासाठी मोठी गर्दी करायचे.पण ,या गर्दीतही तानाजी पोवार हे सर्वांच्या तक्रारी ऐकून घेवून तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या मोबाइलवरुन संपर्क करायचे.त्यामुळे सदर तक्रारीची समस्या मार्गी लागायची ,असा अनेकांनी अनुभव घेतला आहे.हे अनेकांच्या प्रत्यक्ष तोंडातून ऐकायला मिळते ,तेव्हा हा माणूस राजकारणातून समाजकारण करण्यात कमालीचा यशस्वी ठरला असल्याची खात्री पटते.

खरंतर राजकारणापलिकडे जावून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेवून कार्यरत राहणारेच सत्ता असो किंवा नसो कायमच सर्वसामान्य जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण करतात.समाजाचे दु:ख हेच आपले दु:ख आणि समाजाचे सुख हेच आपले सुख मानून कार्यरत राहण्याची त्यांची प्रामाणिक धडपड ही समाजमनाला कर्तृत्व व नेतृत्व मान्य करायला भाग पाडते.याच लोकपाठबळाच्या जोरावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची त्यांची विकासाभिमुख कार्यपध्दत समाज विकासात मोलाची भर घालणारी ठरते.याचा अनेकदा प्रत्यय तानाजी पोवार यांच्या कौशल्यपूर्ण कार्यातून वस्ञनगरीने घेतला आहे. म्हणूनच ते सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून काल ,आज आणि उद्याही राजकारणातून समाज विकासासाठी झटत राहतानाच सर्वसामान्य जनतेचा आधारवड ठरतील ,अशीच त्यांची दमदार यशस्वी वाटचाल सुरु आहे.अशा कार्यकुशल सर्वसमावेशक नेतृत्वाकडून अखंडितपणे प्रामाणिक आदर्श समाजकार्य घडत राहो ,याच त्यांना आजच्या वाढदिवसाच्या उदंड व मनस्वी शुभेच्छा !

  • सागर बाणदार
    मो.८८५५९१५४४०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]