निलंगा तालुक्यातील उमरगा ( हा )च्या वीर जवान श्रीधर चव्हाण सुपुत्राला मोठ्या जनसागरात आनंतात विलीन
निलंगा-( प्रतिनिधी )- निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथील जवानाचा कर्तव्य बजावत असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
वीर जवान श्रीधर व्यंकट चव्हाण (वय 32) जवान श्रीधर चव्हाण हे जम्मू श्रीनगर येथे कर्तव्य बजावत होते. 8 जानेवारी रोजी सकाळी सैनिकांसाठी असलेल्या टेंटमध्ये श्रीधर चव्हाण गेले होते. मात्र अचानक गॅसचा स्फोट झाल्याने श्रीधर चव्हाण गंभीर जखमी झाले.या स्फोटात श्रीधर चव्हाण यांचे संपूर्ण शरीर भाजले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली .

श्रीधर चव्हाण यांच्या निधनाची बातमी समजताच दोन दिवस गावावर शोककळा पसरली होती गुरूवार 12 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पार्थिव निलंगा शहरात आल्या नंतर मोटार सायकल राँली काढून वीर जवान अमर रहे च्या घोषणा देत पार्थिव 8 .30.वाजता त्यांच्या घरी आणण्यात आले त्यानंतर त्यांचे पार्थिव जिल्हा परिषद शाळेत अंत्यदर्शन करण्यासाठी ठेवले होते नंतर त्यांचे संपूर्ण गावातून अंत्य यात्रा काढण्यात आली .
श्रीधर चव्हाण यांचे पार्थिव मूळ गावी आल्या नंतर जवान श्रीधर व्यंकट चव्हाण यांच्यावर 11:30 वाजता शासकीय इतमामात त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे तहसीलदार अनुप पाटील नायब तहसीलदार घनश्याम आडसुळ जाधव गटविकास अधिकारी अमोल ताकभाते लातूर जिल्ह्याच्या माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडीतराव धुमाळ काँग्रेस चे प्रदेश सचिव अभय साळुंके शिवसेना तालुका प्रमुख अविनाश रेशमे माजी नगरअध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे चेअरमन दगडू सोळुंके संभाजी ब्रिगेड चे महानगर अध्यक्ष मिथुन दिवे आदीसह महसूल जिल्हा सैनिक बोर्ड.पोलीस प्रशासनाच्या वतीने पुषचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दरम्यान, शहीद जवान श्रीधर चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी व एक मुलगी असा सहा जणांचा परिवार आहे.यावेळी श्रीराम चव्हाण एकनाथ चव्हाण वामन चव्हाण. सुनील चव्हाण माधव लोभे. तंटामुक्त अध्यक्ष जगदीश लोभे श्रीधर लोभे अंकुश लोभे कुमोद लोभे दादासाहेब बिराजदार उपसरपंच किसन रणखांब चेअरमन आत्माराम लोभे बालाजी दिवे विलास लोभे. उमाकांत लोभे तलाठी जोगदंड मँडम.आदीसह जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईक मित्र परिवार व देशसेवा करणारे आजी माझी सैनिक उपस्थित होते.मोठ्या अंतकरणाने गावच्या वीर सुपुत्राला ग्रामस्थांनी शेवटचा निरोप देण्यात आला.