निलंगा-(प्रतिनिधी)-लातूर जिल्हयामध्ये गारपीट झाल्याने पालकमंञी गिरीष महाजन यांनी बैढक व गारपीट भागाचा दौरा केला असून नुकसानीचे पंचनामे करावे असे आदेश दिले आहेत.जिल्हयातील शेतकर्यांवर अवकाळी पाऊस व गारपीट अशी नैसर्गिक आपत्ती आली आहे.अवकाळी पावसात मोठ्याप्रमाणात सर्वदूर गारपीट झाली यामुळे रब्बी हंगामातील पिकाचे,फळबागाचे व भाजीपाल्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.केंद्रात व राज्यामध्ये शेतकरी हिताचे सरकार आहे.
शेतकर्यांवर येणार्या कोणत्याही नैसर्गिक संकटकाळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना दिलासा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस करत आहेत तेव्हा खचून जाऊ नका,असे आवाहन माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
लातूर जिल्हयासह सर्वच तालुक्यात दोन-तीन दिवसापासून अवकाळी पाऊस,वादळी वारे व मोठी गारपीट झाली आहे.अचानक अवकाळी व गाराच्या पावसाने झोडपल्याने हे अस्मानी संकट शेतीतील रब्बी पिकावर आले आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या संकटकाळात मदतीला राज्य सरकार निश्चितच मदत करणार आहे.
याबाबत पालकमंञी गिरीष महाजन यांनी बैठक व गारपीट भागाचा दौरा केला असून नुकसानीचे पंचनामे करावे असे आदेश दिले आहेत.शिवाय निलंगा विधानसभा मतदार संघातील शेतीतील पिकाचे,फळबागांचे,भाजीपाला या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे तात्काळ सादर करावा अशी सूचना निलंगा उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकार्यांना दिली असल्याचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले असल्याचे सांगितले.
अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृृत्वाखालील केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृृत्वाखालील सरकार हे शेतकरी हिताचे सरकार आहे.त्यामुळे नक्कीच शेतकर्यांना तात्काळ मदत करतील शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये,मदत करण्यास सरकार कटीबध्द असल्याचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.




