लातूर ; दि.९ ( प्रतिनिधी )–लातूर येथील श्री देशिकेंद्र विद्यालय मधील 1999 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. विविध उपक्रमाने हा मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यामध्ये माजी गुणवंत व होतकर विद्यार्थी जे आज सामाजिक , राजकीय , शैक्षणिक, क्रीडा, कला ,वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत अशा सर्वांचा परिचय करून देण्यात आला. तसेच विद्यालयातील पहिलीपासून ते दहावीच्या माजी शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून जुन्या व नव्या आठवणींना उजाळा देण्यात आला तसेच नव्या उमेदीला चालना देण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून झाले.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक हित व सामाजिक बांधिलकी कशा पद्धतीने वाढीस लागेल याचाही विचार करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक खानापुरे सर होते .तसेच या मेळाव्यास बुरांडे सर, महाजन मॅडम, उमेश गिरवलकर सर इत्यादी उपस्थित होते.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रशांत घार , अमित ढोले ,राणी पंचाक्षरी, वैभव चिंतलवार,सुषमा बावगे ,शिवकुमार महाजन ,विनया अष्टुरे ,राम भुतडा ,अविनाश चिखलीकर , बालाजी शिराळकर, रुद्रेश्वर स्वामी, पवन नावंदर, स्मृती इटकर , जोत्साना स्वामी, रतन माने, संतोष खानापुरे, , अभिजीत बाबर ,सिद्धेश्वर उदगीरे, उद्धव विभुते इत्यादींनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास 1999 मधील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.