आमदार अभिमन्यू पवार यांचे स्वागत

0
309

*आमदार अभिमन्यू पवार यांचे लातूर नगरीत भव्य स्वागत* 

  

औसा-

मुंबई येथील विधानभवनात दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात औसा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते/लोकप्रिय आमदार श्री. अभिमन्यू पवार साहेबांनी ओबीसी, मुस्लिम, मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात आवाज बुलंद केला असता तालिका सभापती यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारचा शक्तीचा गैरवापर करून तब्बल १२ आमदारांचे निलंबन करून एक प्रकारे डॉ. बाबासाहेबांनी रचलेल्या संविधानाचा घोर अपमान करत लोकशाहीची हत्या केली आहे…

आमदार पवारसाहेबांकडे राजकीय वारसा नसतांना, सरकार नसतानादेखील स्वकतृत्वाने, शेत रस्ता, फळबाग लागवड व इतर अनेक शासकीय योजना सहज राबवल्या. “आमदार आपल्या दारी” या उपक्रमांच्या माध्यमातून औसा पॅटर्न उदयास आला. फक्त १४ महिन्यात क्रांती घडून येवू शकते, हे पवार साहेबांनी सिध्द करून दाखविले. ह्या बाबी सरकारला बघवत नाही का? अरे ! या सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?

ज्या भारतात ७८% लोक शेतीवर अवलंबून आहेत अशा त्या जगाच्या पोशिंदाला वाचवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून, पारंपरिक आमदारांची व्याख्या मोडीत काडून, जनसेवक आमदार कसा असावा? त्याचे आचरण कसे असावे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे मा. अभिमन्यू पवार साहेब…! इतरांना लाजवेल असा आदर्श या आमदार महोदयांनी निर्माण केला आहे. खरं पाहता हा आदर्श आपण सभागृहात तालिका सभापती या नात्याने मांडणं क्रमप्राप्त होते. थोडस उधार मन करणे आवश्यक होते. पण सत्तेचा ‘माज’ तुम्हाला कसे गप्प बसू देईल? खरंच आपण चुकलात!!

कदाचित आज आपण आमदार पवार साहेबांचा ९० ते९५ वाहनांच्या ताफ्यासह व अलोट जनसागरासह लातूर जिल्ह्यातील दौरे पाहात असाल तर लक्षात येईल, की जेवढी घागर उलटी करून दाबायचा प्रयत्न कराल तेवड्याच ताकतीने किंबहूना कितीतरी पटीने जास्त घागर उसळी घेत असते.

तुम्ही विधानसभेत पवार साहेबांना निलंबित करु शकता कारण तेथे सत्ता तुमची आहे पण तुम्ही शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्य जनतेच्या मनातून पवार साहेबांना कसे निलंबित करणार? औसा मतदार संघातीलच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनात घर करुन बसलेल्या पवार साहेबांनवर तुम्ही केलेला अन्याय जनतेच्या दरबारात कधीच माफ होवू शकत नाही. भास्करराव जाधव आणि संपूर्ण महावि(भ)कास आघाडी सरकारला या पापाचे फळ भोगावेच लागेल.

मा श्री अभिमन्यू पवार साहेब प्रचंड मतांनी विजयी होवून आमदार झाले होते तेव्हा जसे जनतेने स्वागत केले होते अगदी तसेच स्वागत याही वेळी पवारसाहेबांचे होत आहे. यावरून हे सिद्ध होते की, ये पब्लिक हैं.. ये सब जानती हैं..!

 

मी या निमित्ताने मोठ्या अभिमानाने सांगू इच्छितो… पवार साहेबांचे निलंबन झाले याचा अर्थ,फक्त सभागृहाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही. एक आमदार म्हणून त्यांचे सर्व अधिकार कायम अबाधित राहतील. पायात भिंगरी बांधलेले पवार साहेब निवांत कसे राहतील? मुंबई वरुन येता येता पवार साहेबांनी प्रधान सचिवाची भेट घेवून पीक विमा बद्दल तक्रार करुन उपाय योजना सुचवून आलेच ना..! आणि लक्षात ठेवा ज्या ज्या वेळी मा श्री अभिमन्यू पवार साहेबांना सकंटाचा सामना करावा लागला त्या त्या वेळी साहेब सर्व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने सोन्यासारखे आणखी निखरुन त्या संकटावर मात करुन विजयी झाले आहेत. याही वेळेस असेच होईल.

बस देखते रहना तूम….

 

ये महाभारत का अभिमन्यू नहीं…

 ये आज का अभिमन्यू हैं…

ये चक्रव्यूह में घुसता भी हैं और चक्रव्यूह तोडता भी हैं…!!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here