27.8 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeठळक बातम्या*आई - वडीलांच्या कष्टाचे विद्यार्थ्यांनी मोल करावे - आ. अभिमन्यू पवार*

*आई – वडीलांच्या कष्टाचे विद्यार्थ्यांनी मोल करावे – आ. अभिमन्यू पवार*

औसा –  स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यांनी अधिकारी व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून पालक काबाडकष्ट करतात आशा परिस्थितीत विद्यार्थीनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटीने आपले ध्येय गाठावे.आपल्या आई – वडीलांच्या कष्टाचे विद्यार्थ्यांनी मोल करावे असे प्रतिपादन आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे. 
                     दि. १३ आॅगस्ट रोजी माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मातोळा (ता.औसा) येथे आयोजित हर घर तिरंगा अभियान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोक मोहेकर, जिल्हा परिषद लातूर उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, ज्ञानप्रसारक मंडळाचे संचालक गोकुळ घोलप, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता,अंजली मोहेकर, कौशल्या घोलप, माजी मुख्याध्यापक बाबासाहेब गुंजाळ, शालेय समितीचे अध्यक्ष दिगंबर भोसले, मुख्याध्यापक संजय भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, सरचिटणीस संजय कुलकर्णी, सरपंच बालाजी सूर्यवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष आण्णासाहेब भोसले, सभापती राजेंद्र भोसले, मुख्याध्यापक प्रविण कोपरकर, मधुकर भोसले, अमरसिंह भोसले,धनंजय भोसले, चंद्रकांत ढवण, शिवाजी भोसले, मनोज भोसले, काशीनाथ भोसले, दत्तात्रय नन्नवरे, सुलतान शेख, दत्ता भोसले, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते. यावेळी आ. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की लातूर जिल्हा हा शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला येत आहे.या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय समोर ठेवून मेहनत करावी. पालकांसह शिक्षकांच्या शिकवणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी असे त्यांनी सांगितले. 

             या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय भोसले यांनी तर समारोपर भाषण डॉ अशोक मोहेकर यांनी केले. याप्रसंगी इयत्ता दहावी वर्गातील ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. आशा गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा मुख्याध्यापक संजय भोसले यांच्या वतीने १२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपये रोख व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी निती आयोगाकडून मिळालेल्या अटल टिंगरिंग लॅबची पाहाणी करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रयोगाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. शिनगारे यांनी तर आभार प्राध्यापक कैलास जाधव यांनी मानले… 

तळागाळातील मुलांना आधार द्या – तृप्ती अंधारे 

समाजातील आर्थिक संपन्न लोकांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याची गरज आहे. जेणेकरून सशक्त समाज घडविण्याचे काम त्यांच्या हातून घडेल. विद्यार्थ्यांची स्वप्न वेगवेगळी असतात तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करिअर बनवा पण त्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत व्हा.आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान व मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.असे सांगून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून आज नंदुरबार जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी म्हणून काम करणारे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र माहूर यांच्या सारख्या अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावे असे यावेळी बोलताना उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]