साहित्य सेवा पुरस्कारांने गौरव#
लातूर–
येथील सुप्रसिध्द कवी व वात्रटिकाकार श्री भारत सातपुते यांनी पुस्तक लेखनाचे अर्धशतक ओलांडले असुन वाड्.मयाच्या अनेक प्रकारात लेखन केले आहे,तसेच शैक्षणिक क्षेत्रातील निर्भिड प्रवासही उल्लेखनीय आहे.या संपुर्ण कार्याची दखल घेवून विदर्भातील नामांकित अशा झाडीबोली साहित्य संघाच्या वतीने नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातील २९व्या साहित्य संमेलनात पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते डॉ. हरिश्चंद्र बोरकर साहित्य सेवा पुरस्कारांने श्री सातपुते यांचा गौरव करण्यात आला.यावेळी केंद्रीय समन्वयक बंडोपंत बोढेकर, कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे आदी उपस्थित होते.

#आम्ही फुले बोलतोत
सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान#
ठाणे येथील मराठी साहित्य मंडळाच्या वतीने कवी भारत सातपुते यांच्या “आम्ही फुले बोलतोत!” या दिर्घ कवितेच्या पुस्तकास राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने नुकताच उस्मानाबाद येथील एकदिवसीय भव्य कविसंमेलनात खा.ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.राज्यभरातुन आलेल्या चारशे पंचावन्न पुस्तकांतुन श्री सातपुते यांच्या या पुस्तकाची निवड झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रकाश घुमटकर हे होते.
कवी भारत सातपुते यांना विविध क्षेत्रातील आजतागायत तीन डझनपेक्षा जास्त पुरस्कार लाभले आहेत.