23.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeराजकीयडांबरीकरण, रस्ता मजबुतीकरण

डांबरीकरण, रस्ता मजबुतीकरण

शासनाने प्राधान्याने कोरोना साथ घालविण्यासाठी प्रयत्न केले

 आता विकासकामांना गती देण्यासाठी आपले नेते 

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख प्रभावी पाऊले उचलत आहेत

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्यासह 

विविध पदाधिकारी यांच्या हस्ते रस्ता डांबरीकरण व रस्ता मजबुतीकरण कामाचा शुभारंभ

लातूर  प्रतिनिधी : दि. १८ मार्च २०२२ :

  देशासह संपूर्ण राज्यात कोरोना प्रादूर्भावामुळे विकासाची नवीन योजना सरकारला सुरू करता आली नाही. शासनाने प्रथम प्राधान्याने कोरोना साथ घालविण्यासाठी प्रयत्न केले. आज कोरोनाच्या भीतीचे सावट आता दूर होत आहे. यामूळे विकासकामांना आता गती देण्यासाठी आपले नेते पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख प्रभावी पाऊले उचलत आहेत. यांचाच एक भाग म्हणून या योजनाचा शुभारंभ होत असून लातूरकरांना चांगल्या सोयीसुविधा सोबत देशातील पहिली महिलांना मोफत सिटी बसचा प्रवास सुविधा देणारी महानगरपालिका ही लातूरची महानगरपालिका ठरली असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी लातूर शहराजवळील गावांना रस्त्यास जोडणाऱ्या विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलतांना सांगितले. 

 लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी यांच्या हस्ते आज गुरुवार दि. १७ मार्च २०२२ रोजी सकाळी खंडापूर येथे खंडापूर ते राज्यमार्ग २४२ रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा, आखरवाई येथे आखरवाई ते विमानतळ रस्त्याच्या डांबरीकरण व आखरवाई ते गातेगाव रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणचा, लातूर शहरानजीकच्या भांबरी चौक येथे राज्यमार्ग २३६ ते भांबरी (बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा तर साई येथे साई ते गव्हाण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

  लातूर तालुक्यातील आखरवाई येथे आखरवाई ते विमानतळ रस्त्याच्या डांबरीकरण व आखरवाई ते गातेगाव रस्त्याच्या खडीकरण व मजबुतीकरणचा शुभारंभ करण्यात आला.

या शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे संजय पाटील खंडापूरकर, संचालक अनंत बारबोले, प्रताप पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.जी.गंगथडे, उपअभियंता जयंत जाधव, शाखा अभियंता ए.व्ही.उडते, सोशल मीडिया काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, महेश काळे आखरवाईच्या सरपंच शांताबाई सोनवणे, उपसरपंच चंद्रकांत लोखंडे, श्रीमंत कदम, व्यंकट बोंबलगे, तायर पटेल, नारायण देशमुख, व्यंकटराव कदम आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आखरवाई ग्रामस्थ उपस्थित होते.

  यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले की, कोरोनामुळे कुठलीही विकासाची नवीन योजना सरकारला सुरू करता आली नाही. कोरोनाच्या भीतीचे सावट आता दूर होत आहे. विकास कामांनी आता गती घेतली आहे. आपल पालकत्व पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्यासारख्या नेत्याकडे सक्षम आहे. पालकमंत्री ना. देशमुख यांनी कोरोना काळात लातूरकरांना चांगल्या सोयीसुविधा मिळवून दिल्या. देशातील पहिली महिलांना मोफत सिटी बसचा प्रवास सुविधा देणारी महानगरपालिका ही लातूरची महानगरपालिका आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास सहकारी साखर संचालक अनंत बारबोले यांनी करून शेवटी उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले

खंडापूर ते राज्यमार्ग २४२ रस्त्याच्या 

मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ

  याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून कोरोनामूळे ठप्प झाले होते. शासनाचा विकासाचा सर्व फंड लोकांच्या आरोग्यासाठी कोरोनात साथ घालविण्यासाठी खर्च झाला. पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी सर्वांची काळजी घेऊन कोरोनात चांगल्या सोयीसुविधा मिळवून दिल्या. कोरोना काळात सुरक्षेची काळजी घेतली. लातूर येथील रूग्णासाठी भोजन व्यवस्था केली. झाली खंडापूर येथील नागरीकांनी केलेल्या मागण्यां मंजूर होणेसाठी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून त्या पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली. 

  यावेळी खंडापूरचे सरपंच कुमार पाटील, ग्रामसेवक बी.बी.दुधाटे, रामराव साळुंखे, बब्रुवान आटकरे, महेश सुरवसे, सुरेश घार, संदिपान दरोडे, निळकंठ पाटील, शेखर पाटील आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते खंडापूर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील खंडापूरकर यांनी करून खंडापूर ते आलमला रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी केली व शेवटी उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.

   भांबरी चौक येथे राज्यमार्ग २३६ ते भांबरी (बसवंतपूर) 

रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

   लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा फायदा लातूर जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सह विविध रुग्णालयांना करून देऊन कोरूना काळात उत्कृष्ट आरोग्याच्या सोयीसुविधा मिळवून दिल्या पालकमंत्र्यांनी लातूरच्या विकासाचा आराखडा तयार केला असून लातूर चा विकासाचा पॅटर्न ते निर्माण करत आहेत विकासाची सर्व कामे पालकमंत्री देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून पूर्णत्वाला घेऊन जाऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. 

 लातूर शहरानजीकच्या भांबरी चौक येथे राज्यमार्ग २३६ ते भांबरी (बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी भांबरी (बसवंतपूर) च्या सरपंच पंचशीला वाघमारे, उपसरपंच दिलीप चिकटे, ग्रामसेवक शंकर भोसले, दिगंबर माने, प्रबत पाटील, दिगंबर माने, बिरू सरवदे, मारुती चीगुरे, बसवेश्वर लांडगे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते भांबरी (बसवंतपूर) ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक शंकर भोसले यांनी करून शेवटी उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले

साई येथे साई ते गव्हाण रस्त्याच्या 

डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

  लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले की, शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी करोणावर खर्च केला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी कोरोना काळात लातूरकरांची काळजी घेतली. लातूर शहराचा विकास हा आजूबाजूच्या गावावर अवलंबून आहे यामुळे या गावच्या विकासाकडेही लक्ष दिले जाते. गावातील इतरही मागण्या आम्ही पूर्ण करू विकासाच्या बाबतीत आम्ही सर्व गावांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

  साई येथे साई ते गव्हाण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रमास साईच्या सरपंच सुमित्रा माने, उपसरपंच अमोल वाघमारे, ग्रामसेवक राजेंद्र परमेश्वरे, लिंबराज पवार, राहुल पवार आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते साई ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच अमोल पवार यांनी करून शेवटी उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. 

चौकट

  साई गावाचे शेतकरी दत्ता सोमवंशी यांनी मांडलेल्या अडचणी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख आणि समद पटेल यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्या शेतकऱ्याच्या तक्रारीची जागेवर सोडवणूक केली.

———————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]