.. होय, उस्मानाबाद मध्येही महाबळेश्वरच्या दर्जेदार स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन !
अत्यंत नाजूक आणि ठराविक हवामानात येणारी ‘स्ट्रॉबेरी’ उस्मानाबाद जिल्ह्याच्या मातीतही पिकवून शेतकरी श्री.वैभव विश्वंभर सूर्यवंशी रा. तोरंबा यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी, शेती संबंधित व्यवसायांसाठीच्या विविध योजनांची माहिती घेऊन सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा..
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, विशेषतः युवा पिढीने केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, अत्याधुनिक पद्धतीने उत्पादन कसे करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
