आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते कासारशिरसी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
निलंगा -; (प्रतिनिधी )-– महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर असलेल्या कासारसिरसी मोठी बाजारपेठ असताना असूनही दुर्दैवाने या शहराचा पाहिजे तेवढा विकास होवू शकला नाही.मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असताना कासारसिरसी च्या इतिहासात ५५ लाखांचा विकास निधी दिला.येणाऱ्या काळातही विविध माध्यमांतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. विकास कामांचे श्रेय घेणाऱ्यांमध्ये मी नाही.मात्र कासारसिरसी ला पाणीपुरवठा योजना कोणाच्या प्रयत्नाने मिळाली हे लोकांना माहिती आहे.यापुढेही कासारसिरसी च्या सर्वागीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही आ. अभिमन्यू पवार यांनी दिली ते जलजीवन मिशन अंतर्गत कासारशिरसी (ता.निलंगा ) येथील १० कोटी २९ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन शुभारंभ बोलत होते.
यावेळी मंचावर सरपंच सौ. दिपाली पांचाळ, उपसरपंच बडेसाब लकडहारे,प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. कायंदे, नायब तहसीलदार अरुण महापुरे, विस्तार अधिकारी संजय आडे, परिक्षीत अभिमन्यू पवार, उप अभियंता पाटील, शाखा अभियंता संजय राठोड,शाखा अभियंता संजय स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ढमाले, भाजपचे कासारसिरसी मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, ठेकेदार विजय मुंडे,आदी उपस्थित होते.यावेळी आ. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की या योजनेव्दारे कासारसिरसी शहराला शुध्द पाणीपुरवठा केला जाणार आहे. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक असताना लातूर जिल्ह्य़ातील विविध पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव निधी दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने किल्लारी पाणीपुरवठा योजना २९ कोटी, मातोळा पाणीपुरवठा योजना ३८ कोटी, मसलगा ६ कोटी ५० लाख, औसा शहर पाणीपुरवठा योजना ४५ कोटीचा निधी मंजूर करून दिला. कासारसिरसी पाणीपुरवठा योजनेसाठी विधीमंडळात, तारांकित प्रश्न व कपात सूचना आदी मांडत तत्कालीन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री अमित देशमुख, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला.हि पाणीपुरवठा योजना साधारण ८ महिन्यात पूर्ण होईल बडूर तलावातून या योजनेला पाणीपुरवठा होणार आहे साधारण तेरा हजार लोकसंख्येच्या क्षमतेची हि योजना आहे.

कासारसिरसी येथे रस्ते, नाल्या याचे काम होवू शकले नाही विकासापासून दुर असलेल्या या शहराच्या विकासासाठी कासारसिरसी नगरपंचयतीच्या दुष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कासारसिरसी ला जोडणारे सर्व रस्ते विकास आवश्यक आहे. याचबरोबर कोराळीचा रस्त्याचे कामही लवकरच सुरू केले जाईल. पंतप्रधान व मुख्यमंत्री सडक योजनेत हा रस्ता प्रस्तावित केल्याचेही यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश चिंचोणकर तर सुत्रसंचालन ज्ञानेश्वर मडूळे यांनी केले.याप्रसंगी प्रशांत येळनुरे, जिलानी बागवान,कविता गोरे, धनराज होळकुंदे, बळवंत पाटील, नितिन पाटील, ओम बिराजदार, गोरख होळकुंदे, पंडित फुलसुरे, ओम माने,धोंडीराम बिराजदार, अमोल पाटील,लालासाहेब शेख आदीसह ग्रा. पं सदस्य उपस्थित होते..