लातूर– कीर्ती उद्योग समूहाचे संस्थापक विष्णुदास भुतडा( वय 92) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी 11 वाजता मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विष्णुदास भुतडा यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कीर्ती उद्योग समूहाची उभारणी केली. उद्योग क्षेत्रात त्यांनी गगन भरारी घेतली .त्यांच्या पश्चात चार मुले सतीश, अशोक, कीर्ती, भारत व एक मुलगी मीना, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. विष्णुदास भुतडा यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रातील एक मोठा दिग्गज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे .