लातूर ;दि.५ ( माध्यम वृत्तसेवा )-
गुरूवार दि.१३ ऑक्टेंबर रोजी रात्री ७ वा दगडोजीराव देशमुख नाट्यगृह येथे जानाई विद्यार्थी मंडळ आयोजीत ” सारखं कांहितरी होतय ” या नाटकाच्या प्रयोगासाठी प्रसिद्ध नाट्य कलाकार प्रशांत दामले व वर्षा उसगांवकर लातूरला येत आहेत.
पूणे येथे जानाई विद्यार्थी मंडळाचे पूर्व अध्यक्ष अभियंता.भिकाजी पाटील, , .अक्षय कुलकर्णी, .ज्ञानोबा कुलकर्णी, . सारंग चैतन्य तसेच .हर्षद बोकील , .ऋचा ठोंबरे, यांनी महेश दामले व वर्षा उसगांवकर यांची भेट घेऊन लातूर प्रयोगासाठीचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्विरकारले आहे.

जानाई विद्यार्थी मंडळाने मागील २२ वर्षात २२ सांस्कृतिक कार्यक्रमाचे लातूर मध्ये आयोजन केले. यातून जो निधी संकलीत झाला यातून १३५ विद्यार्थ्यी अभियंते झाले.
या वर्षाच्या नाटकाच्या आयोजनातून जो निधी संकलीत होईल तो निधी ११ विद्यार्थीना अभियांत्रिकी शिक्षणासाठी दिला जाणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूरकरांनी नाटकास प्रतिसाद देत जानाईच्या विद्यार्थी साह्य निधी उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन श्री जानाई प्रतिष्ठानने केले आहे.