राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात भाजपाला दणदणीत यश;
आ. रमेशआप्पा कराड यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष
लातूर दि.०३-नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीच्या मतमोजणीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय संपादन करून एक हाती सत्ता मिळविल्याने भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या लातूर येथील संवाद संपर्क कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

पाच राज्यात विधानसभेची निवडणुक झाली चार राज्यातील निवडणुकीची रविवारी मतमोजणी होऊन त्यात भारतीय जनता पार्टीने एक हातात सत्ता मिळवली या विजयाचा जल्लोष भाजपाच्या लातूर येथील संवाद कार्यालयासमोर भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत फटाके फोडून एकमेकांना मिठाई देऊन आनंद व्यक्त केला.

देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेल्या नऊ वर्षात देशभर गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, देशाचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला, वर्षानुवर्ष अडगळीत पडलेल्या राम मंदिर, कश्मीरचे ३७० कलम यासह अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने विश्वास व्यक्त केला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

भाजपाच्या संवाद कार्यालयासमोर जल्लोष व्यक्त करताना भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, लातूर ग्रामीण अध्यक्ष अनिल भिसे, रेणापुर तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वसंत करमुडे, महिला आघाडीच्या शिला आचार्य, संगायो समितीचे सदस्य शरद दरेकर, चंद्रकांत कातळे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमर चव्हाण, मुरडवचे सरपंच लक्ष्मण यादव, उपसरपंच आकाश चव्हाण, सिंधगावचे सरपंच सुनील चेवले, पानगावचे बाबुराव कस्तुरे, कार्तिक गंभीरे, यशवंतवाडीचे सरपंच ओम चव्हाण, हरवाडीचे उपसरपंच चंद्रकांत माने, भंडारवाडीचे व्हाईस चेअरमन भरत बरुळे, पाथरवाडीचे सरपंच महेश सुडे, उपसरपंच व्यंकट येमले, भालचंद्र सूर्यवंशी लक्ष्मण खलंग्रे, भैय्या गाडे, संतोष बरुळे, कल्याण हारवाडीकर, भरत बरुळे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
