24.5 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसामाजिक*भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व आ. अभिमन्यू पवार यांचे प्रयत्न आनंददायी -...

*भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन व आ. अभिमन्यू पवार यांचे प्रयत्न आनंददायी – प्रवीणसिंह परदेशी*


औसा – जेवढे मोठे संकट येतात तेवढी प्रतिकार शक्ती वाढते भूकंपाच्या ऐवढया मोठ्या संकटातून आज हे लोक पुन्हा उभे राहिले आहे.हे त्याच्या प्रतिकार शक्तीचे प्रतिक आहे.१९९३ च्या भूकंपानंतर अनेक समस्यांनी डोके वर काढले होते. त्यावेळी प्रशासनाने चांगले काम या भागात केले.यानंतरही भूकंप होऊ शकतो अशी मानसिकता ठेवून तुम्ही भूकंपपुर्व तयारी ठेवणे आवश्यक आहे जिल्ह्य़ाचे प्रशासन व आमदार अभिमन्यू पवार यांनी या भागातील समस्या सोडविण्यासाठी आशा शिबीराचे आयोजन केले आहे. याच्यावरून लोकांच्या समस्या सोडविताना प्रशासनसोबत लोकप्रतिनिधी हा एकत्रितपणा निश्चितच आनंददायी असल्याचे पाहून मनस्वी आनंद झाल्याचे सुतोवाच केंद्रीय सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी काढले आहेत.

 
           किल्लारी भूकंप स्मृतिदिन व सेवा पंधरवडा निमित्ताने (दि.३०) सप्टेंबर रोजी किल्लारी येथील निळकंठेश्वर देवस्थान मंदिरात औसा व निलंगा तालुक्यातील भूकंपग्रस्त अ व ब वर्गवारीच्या गावांमधील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आवश्यक कार्यवाही आणि उपाययोजना करण्यासाठी समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा केंद्रीय सचिव प्रवीणसिंह परदेशी, आमदार अभिमन्यू पवार, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आदींची उपस्थिती होती.या शिबिराच्या माध्यमातून भूकंपग्रस्त भागातील नागरिकांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणात,शिधापत्रिका आदी प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी १९९३ च्या प्रलयंकारी भूकंपाची आठवण करून देत सांगितले की या भूकंपात आर्थिक संपन्न कुटुंबाच्या अधिक घरे जमिनदोस्त झाले. यामध्ये अनाथ झालेल्या लहान मुलांना व विधवा महिलांना त्यांच्या जमिनीच्या संरक्षणासाठी एक विशेष मोहिम राबविली होती.त्यासाठी काही सेवाभावी संस्थेची मदत घेतली होती. ज्यामुळे त्यांना नंतर त्यांच्या जमिनीचा ताबा मिळाला. ऐवढया मोठ्या संकटातून हि माणसे पुन्हा उभी राहिली हि त्यांच्या प्रतिकार शक्तीचे प्रतिक असून आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांनी घेतलेले काम कौतुकास्पद आहे. आशा शिबीरातून ते या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हि मनस्वी आनंददायी बाब आहेच याचबरोबर आमदार फंडातून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी मतदारसंघात १ हजार किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते कामे केली हि विशेष बाब असल्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यातील प्रशासन व लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांच्या कामाचे कौतुक केले. 


                  याप्रसंगी आमदार अभिमन्यू पवार बोलत होते की. भूकंपग्रस्त भागातील समस्यांविषयी नागरिक वारंवार भेटत असल्याने त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दुष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध प्रमाणपत्रासाठी नागरिकांनी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यापेक्षा आशा शिबिरातून प्रशासन आपल्या दारी हि संकल्पना पुढे येत आहे.जणेकरुण लोकांच्या समस्यांचा निपटारा होईल. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, भूकंप पुनर्वसन विभागाने त्याच्या स्तरावरील सर्व कामे तातडीने करावीत माझ्या स्तरावरील कामे करण्याची जबाबदारी माझी आहे. भूकंपग्रस्त भागातील किल्लारी व मातोळा पाणीपुरवठा पुनर्जीवित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला कार्ला व कुमठा गावातील पुनर्वसनासाठी विधीमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला भूकंपग्रस्त भागातील प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असून गोगलगाय प्रादुर्भाव व संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषाच्या पलीकडे जाऊन मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे गोगलगाय प्रादुर्भावाने व संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याचे महाराष्ट्रात शेतरस्ते कामासाठी आमदार निधी देणारा एकमेव आमदार आपण असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]