24.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeराजकीय*विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने बंद करावा-आ. कराड*

*विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने बंद करावा-आ. कराड*

१० कोटी ५५ लाख रुपयाच्या विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमात आ. रमेशआप्पा कराड

      लातूर दि.२३ – पैशाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो या भ्रमात काँग्रेसवाल्यांनो आता राहू नका. भाजपाच्या विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रकार थांबवा. गेल्या विधानसभा निवडणुकीत आईला विकत घेण्याचे पाप केले. येणाऱ्या निवडणुकीत जनता व्याजासकट बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

            रेणापूर तालुक्यातील खरोळा जिल्हा परिषद गटातील मौजे कारेपूर ७ कोटी ५० लक्ष तळणी ९६ लक्ष यशवंतवाडी १९ लक्ष मोहोगाव ७३ लक्ष रामवाडी ५२ लक्ष खरोळा ३४ लक्ष असे एकूण सहा गावातील तब्बल दहा कोटी ५० लक्ष रुपये खर्चाच्या जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल, नल से जल, पंतप्रधान ग्राम सडक योजना, मातोश्री पांदन रस्ता, गावांतर्गत आमदार रमेश आप्पा कराड यांच्या विकास निधीतून सिमेंट रस्ता, २५/१५ योजने अंतर्गत विविध विकास कामे, स्मशान भूमीशेड, सभागृह, ग्रामपंचायत इमारत आदी विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतील विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आणि खासदार सुधाकर शृंगारे यांच्या शुभहस्ते सोमवारी सायंकाळी झाला. कारेपूर येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमातून आ. कराड बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड. ज्ञानेश्वर कापसे हे होते.

          विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा निमित्ताने प्रत्येक गावागावात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात फटाक्याची आतिषबाजी करून गावकऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, लातूर ग्रामीणचे अध्यक्ष अनिल भिसे, माजी सभापती बायनाबाई साळवे, माजी सभापती अनंत चव्हाण, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, महेंद्र गोडभरले, भागवत सोट, सुकेश भंडारे, सिद्धेश्वर मामडगे, वसंत करमूडे, सुरेंद्र गोडभरले, शरद दरेकर, अभिजीत मद्दे, भागवत गीते, रमा फुलारी, नामदेव बोबडे, गोपाळ पडले, शीला आचार्य यांच्यासह अनेकांचे प्रमुख उपस्थिती होती.

          यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, गेल्या ७५ वर्षात देशाची सर्वाधिक सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी देऊ शकले नाही. जातीपातीचे राजकारण करून आपसात भांडणे लावली, गरीबी हटावचा नारा देऊन गरिबांना गरीबच ठेवण्याचे पाप केले असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब गोरगरीब गरजूंसाठी घरकुल, शौचालय, गॅस, शेतकऱ्यांना पेन्शन, कोट्यावधी जनतेला मोफत राशन यासह अनेक कल्याणकारी योजनाची प्रभावी करून गरजूंना न्याय देण्याची भूमिका घेतली. देशाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने घेऊन जात आहेत देशाची शान आणि मान जगात उंचावण्याची काम केले आहे. गेल्या नऊ वर्षाच्या काळात मोदी साहेबांवर भ्रष्टाचाराचा एक आरोप होऊ शकला नाही हा देशाचा अभिमान आहे.

           गेल्या अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या अभद्र युतीच्या महाविकास आघाडी सरकारने केवळ वसुलीचेच काम केले कोणतेही विकासाची कामे केली नाहीत. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासनाने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. गावागावातील विकास कामासाठी भरीव निधी दिला. गोगलगाय, सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे नुकसानीत आलेल्या जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करून दिलासा दिला असल्याचे बोलून दाखविले.

लातूर ग्रामीण मतदार संघात सतत तीन वेळा निवडून आलेल्या काँग्रेस आमदारांनी कोणती विकासाची कामे केली असा प्रश्न उपस्थित करून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जनतेने विकासाच्या बाजूने राहून भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी. महेंद्र गोडबोले आणि सुरेंद्र गोडबोले दातृत्वाची भूमिका काम करणारे आहेत. खरोळा जिल्हा परिषद गटात झालेल्या कामाच्या आधारावर गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्याने भाजपाचा उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.

         यावेळी बोलताना खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्र शासनाने केलेल्या विविध कामाची आणि गोरगरीब जनतेसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती देऊन देशातील नागरिकांना हक्काचं घर आणि पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचा पंतप्रधान मोदी यांनी निर्धार केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. ज्ञानेश्वर कापसे म्हणाले की पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला या प्रश्नाची सोडवणूक भाजपानेच केली त्याचा मनस्वी आनंद असून खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा उत्सवाचा सण आहे.

       यावेळी अँड. दशरथ सरवदे यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नंतर आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून या भागातील विकासाला गती मिळाली असल्याचे बोलून दाखवले. प्रारंभी महेंद्र गोडभरले यांनी आपल्या प्रस्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाच्‍या मागची भूमिका विशद केली.

         या जाहीर कार्यक्रमात खरोळा जिल्हा परिषद गटातील गोविंदनगर, सेलू, यशवंतवाडी, हरवाडी, जवळगा येथील भाजपाच्या ग्रामपंचायत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा त्याचबरोबर रेणापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन गोपाळ पाटील यांचा आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत दगडू पुरी महाराज, साहेबराव गुळबिले, ओमकार शिरसागर, रामराव ठोंबरे, राजेश काळे, शंकर माने, धोंडीराम ठोंबरे यानी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहाने यांनी केले.  या कार्यक्रमास कारेपूर आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिक भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]