निलंगा-(प्रशांत साळुंके)-शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाकली साधारणता ३५० वर्षापासून पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाकलीतील पुरातन श्री हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान असून चैत्र पौर्णिमेपासून पाच दिवस पालखी,छबिना,भारुडांचे सवाल जवाब,गुळ वाटपाचा कार्यक्रम,कुस्त्यांचा जंगी कार्यक्रम असे अनेक पारंपरिक उपक्रमांच्या माध्यमातून ही यात्रा साजरी केली जाते.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मांजरा नदीच्या कुशीत वसलेल्या बाकली या गावी श्री हनुमान पुरातन मंदिर आहे.इंग्रज रजाकार राजवटीच्या अत्याचारांचा साक्षी असलेले हे मंदिर आहे.या मंदिराची देखभाल सेवा मूळच्या बंगालचे असलेले महंत गोविंददास महाराज यांनी केले.त्यानंतर त्यांचे निटूर येथील शिष्य किशनदास महाराज यांनी मंदिराचा कारभार पाहिला.त्यानंतर मंदिराचा ताबा निजाम शासनाने आपल्या ताब्यात घेऊन तात्कालीन ठाणे व तालुका असलेल्या बोरी येथून मंदिराचे सूत्रे हलू लागले.गावकऱ्यांनी अल्पावधीतच हे मंदिर ताब्यात घेऊन किशनदास महाराजांचे शिष्य सेवादास महाराज यांना गादीवर बसवले.दरम्यान तुळशीदास महाराजांनी कारभार पाहिला.त्यानंतर रामदास महाराज,नारायणदास महाराजांनी मंदिराची जबाबदारी सांभाळली.सध्या शिवरामदास महाराज या मंदिराचे गुरुशिष्य परंपरेची गादी चालवत आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीची भव्य मूर्ती असून १९९० मध्ये लातूरच्या भुतडा परिवाराच्या वतीने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यावेळी मंदिराचा गाभारा व सभामंडपात पूर्णपणे टाइल्स बसून रंग रूमवरती करण्यात आली.

यावर्षी दि. ५ पासून यात्रेची सुरुवात श्रीमद् भागवताचे गाढे अभ्यासक प.पू.श्री कांतूगुरुजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा संपन्न होत आहे. दि.११ रोजी पहाटे ४ वाजता पालखी मिरवणूक भारुडाचा कार्यक्रम होईल व दुपारी गूळ वाटपाचा कार्यक्रम होईल आणि दि.१२ रोजी जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होईल अशी माहिती महंत शिवरामदास महाराज यांनी राजकुमार काळे यांना दिली.तरी पंचक्रोशीतील भक्तांनी लाभ घ्यावा.असे आवाहन महंत शिवरामदास गुरू नारायणदास वैरागी व समस्थ बाकली ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

महंत शिवरामदास महाराज
विविध उपक्रमाबरोबरचदि.१२ रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम ही येथे असतो.येथे अनेक मल्ल आपले कुस्ती केलेचे कौशल्य सादर करतात.या मंदिरात दर शनिवारी ग्रामस्थ भाविकांच्या माध्यमातून अन्नछत्रही चालवले जाते.अशा अनेक धार्मिक उपक्रमातून सलोख्याचे वातावरण निर्माण करत असल्याची माहिती महंत शिवरामदास महाराज यांनी माध्यम वृत्तसेवाशी बोलताना दिली.