24.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeसाहित्य*अनिरुद्ध जाधव यांच्या पुस्तकावर चर्चा*

*अनिरुद्ध जाधव यांच्या पुस्तकावर चर्चा*

ख्यातनाम प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांच्या

‘मनाशी संवाद: आपुलाच वाद आपणासी’

या पुस्तकावर शब्दांकित साहित्यमंच कडून  चर्चा

 लातूर ( प्रतिनिधी) राजर्षी शाहू महाविदयालय येथील ख्यातनाम प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांच्या ‘मनाशी संवाद: आपुलाच वाद आपणासी’ या पुस्तकावर लातूर येथील शब्दांकित साहित्यमंच कडून पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन गुगल मीट या दुरस्थ माध्यमातून करण्यात आले.

  या कार्यक्रमात मनाशी संवाद: आपुलाच वाद आपणासी’ या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘साहित्यनयन’ प्रा.नयन भादुले-राजमाने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षा, सुमती जगताप, होत्या. प्रमुख व्याख्याता समाजप्रबोधन मंचच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. कुसुमताई मोरे, या होत्या. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती ख्यातनाम प्राचार्य अनिरुद्ध जाधव होते.

  यावेळी प्राचार्य डॉ. कुसुमताई मोरे यांनी प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांच्या ‘मनाशी संवाद: आपुलाच वाद आपणासी’ या पुस्तकावर समर्पक भाष्य करून म्हणाल्या, हे पुस्तक सर्वांसाठी संदर्भ ग्रंथ ठरावा असे आहे. या पुस्तकात मुलांमध्ये जिद्द, चिकाटी व नवे काही निर्माण करण्याची प्रेरणा देत असे त्यांनी सांगितले.

  या प्रसंगी बोलतांना प्राचार्य अनिरूध्द जाधव म्हणाले, माझ्या शैक्षणिक वाटचालीत वडीलांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे. अगदी बालवयात वडिलांनी मला शिक्षण घे असा आग्रह धरला. वडीलाचे हे बोल मी ऐकले नसते तर शेतकरीच राहिलो असतो. पण मी शिकलो आणि अनेकांना शिक्षणाची प्रेरणा दिली असे सांगितले. पूढे बोलतांना प्राचार्य अनिरूध्द जाधव यांनी आपल्या गत जीवनातील अनेक आठवांणींना उजाळा दिला.

  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमती जगताप यांनी अध्यक्षीय समारोप म्हणाल्या, की हे पुस्तक नव्या पिढीला मार्गदर्शक ठरावे यासाठी अभ्यासक्रमासाठी लावले जावे.

  या कार्यक्रमास कुसुमताई जाधव, विजयाताई भणगे, डॉ. क्रांती मोरे, शैलजा कारंडे, वृषाली पाटील, विमल मुदाळे, उषा भोसले, उमा कोल्हे, सुरेश गीर, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. नंदकुमार माने, डॉ.ज्ञानेश्वर राऊत, सुलक्षणा सरवदे, डॉ.प्रभा वाडकर, नीलिमा देशमुख, मंगला सास्तुरकर, सत्यशीला कदम, सविता धर्माधिकारी, सौ. राधा गीर, सुनीता मोरे, शुभम वाकडे, डॉ. किशन भोसले, श्री. महेश राजमाने, आशालता बिराजदार, बाळासाहेब कांबळे, मोतीराम निलेवाड, शंकर शेंद्रे उपस्थित होते. तंत्रसहाय्य अपूर्वा राजमाने यांनी केले, शब्दांकित साहित्य मंचच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रगती जोशी हिने केले तर आभार चि. अस्लम शेख याने मानले. याप्रसंगी साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

—————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]