निलंगा,-(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव युवा नेते मा. श्री, अरविंदभैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान . नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या कारकिर्दीतील गेल्या आठ वर्षांपासून झालेल्या विकास कामाची माहिती संपूर्ण जिल्ह्यात देण्याकरिता लातूर भाजयुमोच्या वतीने ‘विकास रथ’ची सुरूवात करण्यात आली.

हा विकास रथ ४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार असून याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्यातून विकास तीर्थ मोटर सायकल रॅली निलंगा तालुक्यात निटूर येथे आगमन होताच शेकडो नागरिकांनी या मोटरसायकल रॅली चे स्वागत केले स्वागत केले . यावेळी जनतेशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांनी देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आठ वर्षाच्या शासन काळात घेतलेल्या लोकहिताची माहिती जनतेला दिली. हर हर मोदी घर घर मोदी ,देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो ,भारत माता की जय जय, जवान जय किसान, वंदे मातरम,भारतीय जनता पार्टीचा विजय असो ,विकास रत्न संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा विजय असो, अशा घोषणा देत रॅली निटूर शहरात करण्यात आली जनतेचा उदंड उदंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी संघटन सरचिटणीस तथा जि.प.चे माजी सभापती संजय दोरवे, जि.प.चे माजी सभापती गोविंद चिलकुरे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडु सोळुंके, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव मंमाळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर चेवले, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मगेश पाटील,कालिदास पाटील,पंकज कुलकर्णी,अशोक शिंदे,जनार्धन सोमवंशी,संगमेश्वर करंजे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ‘विकास तीर्थ’ रॅलीत सहभाग घेतला.