सर्वांना आदराने तुम्ही अशी हाक मारतो मग आईला तू असे का म्हणतो.? यावर रितेशचे अप्रतिम उत्तर..
मुंबई -रितेश देशमुख ने मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्याला खाजगी आयुष्यबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
अशा अनेक मुलाखतीतून रितेश सर्वांचा आदर राखतो, सर्वांना आदराने तुम्ही, आपण असेच बोलतो.
अगदी आपल्या मुलांना देखील तो एकेरी नावाने कधीच हाक मारत नाही, हे तुम्ही देखील अनेकदा अनुभवले असेलच.

ह्याच मुद्द्यावर रितेशला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रितेश सांगतो आमच्या संपूर्ण कुटुंबात सगळ्यांचा असाच मान राखला जातो. माझे आजोबा आम्ही लहान असल्यापासूनच एकेरी नावाने कधीच हाक मारत नाहीत.
आमचे काका देखील आम्हाला तुम्ही असेच म्हणत आलेत. मी सुद्धा माझ्या मुलांना कधी एकेरी नावाने हाक मारत नाही.
आमच्या कुटुंबात ही परंपरा आम्ही सुद्धा आत्मसात करत आणि जपलेली आहे. अशा आवो जावो बोलण्याने समोरच्या व्यक्तीचा मान राखला जातो.
मात्र मला एका हिंदी भाषिक वार्ताहराने हाच प्रश्न विचारला की, तुम्ही सगळ्यांना एकेरी नावाने कधीच हाक मारत नाहीत. मात्र आईला तू असे का म्हणतो?
तेव्हा मी उत्तर दिले होते की, तुम्ही भगवान शंकरजी, रामजी, गणेशजी असे म्हणता.
आम्ही सुद्धा देवाचे एकेरी नाव घेतो. देवाची आणि आईची जागा एकच आहे, म्हणून देवाला आणि आईला सुद्धा तू असेच मी मानतो. रितेशच्या या उत्तराने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत…
#latur
#मराठी चित्रपट