” महिलाओं में निवेश- प्रगतिमान देश” या भारतीय स्त्री शक्ति ,लातूर ने घेतलेल्या विचार मंथन कार्यक्रमास लातूरकरांचा भरभरून प्रतिसाद.
लातूर ;दि.१७ ( वृत्तसेवा ) -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्त्री शक्ति, लातूर द्वारे”महिलाओं में निवेश …प्रगतिमान देश ” या विषयावर १५ मार्च २०२४ ला विचारमंथन कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर ( घुगे) होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय स्री शक्ती या संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा नयनाताई सहस्त्रबुद्धे(दिल्ली ) या होत्या.

वर्षाताईंचे स्वागत भारतीय स्त्री शक्ति लातूरच्या उपाध्यक्षा सुलोचना नोकजा यांनी , तर नयनाताईंचे स्वागत अध्यक्ष भारतीय स्त्री शक्ति, लातूर डॉ. जयंती आंबेगावकर ,यांनी केले.शैलजा कारंडे लिखित समुहगीत डॉ. अर्चना आपटे, श्रद्धा पाटील,मनिषा टोपरे व सुरेखा उत्सुर्गे यांनी गायल्यावर भारतीय स्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा कुमुदिनी भार्गव यांनी प्रास्ताविक केले.

जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे या त्यांच्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून कार्यक्रमाला आल्या,व त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण रममान झाल्या. महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वतःचे अनुभव सांगून, महिलांनी ” मी ” टाईम म्हणजे स्वतःसाठी दिवसाचा थोडातरी वेळ ठेवला पाहिजे असं आवर्जून सांगितले.
नयनाताई सहस्त्रबुद्धे यांचे व्याख्यान तर सर्वांसाठी बौद्धिक मेजवानी च होती.महिलाओं में निवेश म्हणजे नेमकं काय? आणि कसा ? हे त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत सांगितले. त्यांचं भाषण पूर्ण होईपर्यंत हॉलमधील सर्वजण अतिशय एकाग्रतेने, शांतपणे ऐकत होते.कार्यक्रमाची वैचारिक उंची वाढवण्याचं काम नयनाताईंच्या वक्तव्याने केले.

महिलाओं में निवेश प्रगतिमान देश या विषयांमध्ये नयनाताई सहस्रबुद्धे यांनी समाजामध्ये महिला या समाजाची ताकद आहे हे समाजाला सांगणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन करण्यात आले .तसेच महिलां बाबत आपण आर्थिक निवेश तिची सुरक्षा यांचा विचार करत असताना तिचा सामाजिक स्तर कसा उंचावेल यात मध्ये देखील त्या दृष्टीने पाहून तिचा सामाजिक स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पुढील काळामध्ये महिला या पॉलिसी मेकिंग मध्ये खूप महत्त्वाच्या स्थानावर असणे आवश्यक आहे त्यामुळे समन्यायी समाज घडवण्याकरिता महिलांचे शिक्षण आरोग्य तसेच आर्थिक निर्वेश हे करत असताना सर्वांगीण विकास कसा होईल व त्यामध्ये आपण काय निवेश करू शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे त्यामुळे महिलांचा त्यांच्या कुटुंबातील उत्पन्नातील गुंतवणूक अथवा त्याचे अर्थनियोजन यामध्ये महिलांचा सहभाग असणे देखील खूप आवश्यक आहे. तिचा आत्मसन्मान हा देखील महत्त्वाचा आहे अशाप्रकारे लोकप्रबोधन करणे गरजेचे आहे आणि महिलेला राजकारणामध्ये सक्रिय सहभाग होण्याची स्वयं इच्छाशक्ती निर्माण करणे व त्याकरिता लोकप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे लोकल टू ग्लोबल या दृष्टीने युनायटेड नेशन मध्ये राजकीय सामाजिक धार्मिक परिस्थिती चा विचार करून महिला धोरण ठरवले जाते.आताच्या काळामध्ये आरटीफिशियल इंटेलिजेन्सी सारखे आधुनिक तंत्रज्ञान अवगत असताना याबाबत महिलांना त्याप्रकारे संसाधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे काही ठिकाणी आजही समान काम समान दाम ही महिलांच्या बाबतीत प्रचलित नाही त्याचाही विचार करून महिलांमध्ये प्रगतिशील देश करणे करिता महिलांमध्ये निवेश करणे गरजेचे आहे. अगदी पेन्शनर महिला यांची उदाहरण द्यायचे झाल्यास त्यांच्या बँक खात्यातून त्यांनी काढलेले पैसे वापरण्याचे स्वातंत्र्य कित्येक महिलांना नाही त्यांची मुले आणि मुली याचे नियोजन लावतात हाही मुद्दा याप्रसंगी त्यांनी नमूद केला.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम फक्तं महिलांसाठी नव्हता .कार्यक्रमाला पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे ( काका) ,विवेकानंद रूग्णालयाचे अध्यक्ष अनिलराव अंधोरीकर, आबा रेड्डी,प्रदिप नणंदकर,पद्माकर आंबेगावकर यांच्यासह बरेच पुरुष मान्यवर उपस्थित होते.
सुलोचना नोकजा यांनी सर्वांचे आभार मानले .त्यानंतर अनघा अंधोरीकर यांनी म्हटलेल्या शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी सबनीस, व वैशाली देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय स्त्री शक्ती लातूर च्या सर्व सदस्या प्रयत्नशील होत्या.