लातूर ( वृत्तसेवा ) -देशाचे यशस्वी पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेब यांना समर्थन देण्यासाठी लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार खा सुधाकर शृंगारे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत अर्चना पाटील चाकूरकर यांनी देशहित आणि जनहित लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतल्याबद्दल भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

या बैठकीत बोलताना नरेंद्र काळे यांनी बूथ कामाचा आढावा घेऊन प्रत्येक बुथवर 51% भाजपला मतदान झालेच पाहिजे अशी सूचना केली व लोकसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य राहील अशी अपेक्षा व्यक्त केली तर अर्चना पाटील चाकूरकर यांनी निवडणूक काळात काय बोलावे काय बोलू नये याबाबत कार्यकर्त्यांनी कटाक्ष पाळावे अशी सूचना करून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा झाले पाहिजेत हेच ध्येय आणि हा एकच उद्देश आपल्या सर्वांचा असल्याने आ रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वातील लातूर ग्रामीण मधील भाजपाचे लढवय्या कार्यकर्ते जिद्दीने जोमाने काम करून मताधिक्य मिळवतील यात शंका नाही असे बोलून दाखवले.

या बैठकीस बूथ प्रमुख अभियानाचे नरेंद्र काळे, अर्चना पाटील चाकूरकर, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव भागवत सोट, ज्येष्ठ नेते प्रदीप पाटील खंडापूरकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेशदादा कराड, जिल्हा पंचायत राज व ग्रामविकास सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, लातूर ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष अनिल भिसे, रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड दशरथ सरवदे, महेंद्र गोडभरले, अभिषेक आकनगिरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रारंभी रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड दशरथ सरवदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले या बैठकीस लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्रप्रमुख यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती .
